टीम लय भारी
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यात सर्वत्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोशल मीडियावर भगतसिंह कोश्यारी यांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी एक अभंग सादर केला आहे.
महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले
खरा वीर वैरी पराधिनतेचा.
महाराष्ट्र आधार या राष्ट्रचा……..हे लक्षात ठेवावे
अजित दादांनी आपल्या शैलीत राज्यपाल कोश्यारींची कानउघडणी केली आहे. मुंबई, ठाण्यासह अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला आहे. सर्वांना सोबत घेवून जाण्याची महाराष्ट्रची संस्कृती, इतिहास आहे. महाराष्ट्र एकसंध, एकजूट आहे. महामहीम राज्यपाल महोदयांनी अनावश्यक वक्तव्ये टाळावीत. महाराष्ट्रात वाद निर्माण करु नये.
यापूर्वी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राविषयी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यांनी छ. शिवाजी महाराज तसेच ज्योतीबा फुुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. मात्र राज्यपाल कोश्यारी आपला स्वभाव सोडण्यास तयार नाहीत. ते सातत्याने नवे नवे वादग्रस्त विधान करत राहतात.
हे सुध्दा वाचा:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना ‘आगडम तगडम‘ काम नको
जागतिक हास्य दिन ( World Laughter Day) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.…
आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी सप्तशृंग गडाच्या (Saptashringa Gada) शीतकड्यावरुन धक्कादायक घटना समोर आली आहे.…
कांदा बेल्ट असलेल्या भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी (onion…
चैत्र महिन्यात उष्म्याचा असणारा कहर पाहता उटीच्या वारीला (Ooty's wari) विशेष महत्व आहे. मंदिर परिसर…
नासिक नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या (Congress Seva Dal) वतीने संपूर्ण नाशिक शहरांमध्ये भारतीय राष्ट्रीय…
जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…