राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘युवा संघर्ष यात्रा’ आज मंगळवारपासून (24 ऑक्टोबर) सुरू झाली आहे. राज्यातील युवांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी पुणे शहरापासून सुरू होणारी ही पदयात्रा 13 जिल्ह्यांमधून सुमारे 800 किलोमीटर अंतर पार करून नागपूर शहरात पोहोचणार आहे. राज्यातील बेरोजगार युवांचे प्रश्ननागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. यावरुन, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी जोरदार टीका करत, “ही यात्रा बेरोजगार तरुणांच्या न्यायासाठी नसून रोहित पवार यांचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आहे.” असे व्यक्तव्य केले आहे.
राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी रोहित पवार आणि त्यांच्या ‘युवा संघर्ष यात्रे’वर टीका केली आहे. रोहित पवार यांची निघालेली युवा संघर्ष यात्रा ही बेरोजगार तरुणांच्या न्यायासाठी, हक्कासाठी नसून स्वतः चे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. रोहितदादा, एकीकडे सत्तेत असताना आपण ह्याच प्रश्नांबाबत आपण वेगळी भूमिका घेतली होती आणि विरोधात आल्यानंतर आपण वेगळी भूमिका घेतली आहे.”
“खरंतर तुम्ही संघर्षयात्रा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नावर काढण्याऐवजी तुमच्यावर होत असलेल्या पक्षांतर्गत अन्यायाच्या विरोधात यात्रा काढायला हवी होती. कारण, महाराष्ट्रातील युवकांना फसवण्याचे काम आपल्या माध्यमातून होत आहे. आपण वेळोवेळी बदललेली भूमिका ही राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही आणणार.”असे ते पुढे म्हणाले.
दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘युवा संघर्ष यात्रे’ची सुरुवात
आज मंगळवारी, (24 ऑक्टोबर) पासून ‘युवा संघर्ष यात्रे’ची सुरुवात झाली असून पुण्यातील लाल महालापासून यात्रेची सुरुवात झाली आहे. यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या पदयात्रेत विविध पुरस्कार प्राप्त खेळाडू, वकील, डॉक्टर, महिला, कामगार, विविध संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा आणि सामान्य नागरिकही प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
हे ही वाचा
गोपीचंद पडळकर स्वत:च्याच सरकारवर नाराज, उपोषणाची केली घोषणा
निलेश राणेंनी एवढा मोठा निर्णय का घेतला?
बेवडे वाढवण्याचे धोरण, गल्ला भरण्यासाठी सरकारची समिती
युवा संघर्ष यात्रेतील युवांच्या प्रमुख मागण्या
सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…
स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…
भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…
कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…
डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…