सध्या संपूर्ण देशात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. सोमवारी (24 ऑक्टोबर) सर्वत्र दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा लक्ष्मीपूजनचा दिवस साजरा केला गेला. यावेळी प्रत्येक ठिकाणी दिव्यांनी विद्युत रोषनाई करत फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. मात्र, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात यावेळी दिवाळीला ग्रहण लागल्याचे दिसून आले. सोमवारी 24 ऑक्टोबर रोजी देशभरात दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली, सर्वत्र आनंदाचे वातावरण होते, मात्र यादरम्यान काही ठिकाणी आगीच्या घटनाही घडल्या. महाराष्ट्रातील ठाण्यात दिवाळीनिमित्त फटाक्यांमुळे 11 ठिकाणी आग लागली. ठाणे महापालिकेने ही माहिती दिली. महापालिकेने सांगितले की, ठाणे अग्निशमन दलाला सोमवारी आगीच्या घटनांबाबत एकूण 16 दूरध्वनी आले, त्यापैकी 11 ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली. मात्र या आगीच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात सोमवारी रात्री चपला गोदामाला आग लागली, माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले. याशिवाय देशाच्या विविध भागांतून फटाक्यांमुळे पेट घेतल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
हे सुद्धा वाचा
High Court News : अपघातात अपंगत्व आलेल्या व्यक्तींसाठी मुंबई उच्च न्यायालयाने घेतला महत्वाचा निर्णय
Arvind Kejriwal : केजरीवाल म्हणतात दिल्ली सर्वाधिक प्रदुषित शहरांपैकी नाही!
आंध्र प्रदेशात फटाक्याच्या दुकानाला आग, दोघांचा मृत्यू
आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे दोन दिवसांपूर्वी फटाक्यांच्या दुकानात भीषण आग लागली होती. आगीने हळूहळू संपूर्ण दुकानाला वेढा घातला आणि आजूबाजूच्या अनेक दुकानांनाही आग लागली. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे रविवारी पहाटे एका फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत दोघांचा मृत्यू झाला. आग लागलेल्या तीन दुकानांपैकी एका दुकानात कामगार झोपले होते, असे पोलिसांनी सांगितले.
एका मिनिटात 15 लाख फटाके फोडले
अशीच एक घटना राजस्थानच्या अजमेर शहरातून समोर आली आहे. अजमेर शहरालगतच्या ग्रामीण भागातील एका फटाक्यांच्या दुकानाला रात्री उशिरा भीषण आग लागली. या भीषण आगीत दुकानात असलेले पंधरा लाख रुपये किमतीचे फटाके काही मिनिटांत धुराचे झाले. ही घटना अजमेर जिल्ह्यातील मसूद शहराजवळील बेगलियावास गावातील आहे.
दरम्यान, भारतात वाढलेले वायू प्रदुषण लक्षात घेता दिवाळीच्या पार्ष्वभूमीवर अनेक ठिकाणी फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. विशेष म्हणजे देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीत सर्व ठिकाणी तर मध्ये प्रदेशातील काही जिल्ह्यांत फटाकेबंदी जाहीर करण्यात आली होती. मात्र, इतर ठिकाणीू दिवाळी आणि रविवारी (23 ऑक्टोबर) सुरू असलेल्या टी20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यांत भारताने मिळवलेल्या विजयामुळे द्विगुणित आनंद साजरा करण्यात आला.
नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…
पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…
लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…
आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…
महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…
सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास…