महाराष्ट्र

दिवंगत विलासराव देशमुख यांना फोन करा, आजही ते लगेच फोन घेतात

टीम लय भारी

लातूर : बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव दगडोजीराव देशमुख (Vilasrao Deshmukh)  हे दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आज २६ मे रोजी विलासराव देशमुख यांची ७७ वी जयंती आहे. हा मनाचा निरागस नेता महाराष्ट्राने गमावला मात्र आजही प्रत्येकांच्या मनामनामध्ये त्यांचे अढळ स्थान आहे. राजकारणातील या राजहंसाचा ‘तो’ मोबाईल नंबर आजही सुरु असून, आजही ते लगेच फोन घेतात. (Vilasrao Deshmukh’s phone is still on today)

दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांना फोन करा, आजही ते लगेच फोन घेतात. असं बोलंल जात. मात्र ही बाब तितकीच खरी आहे आणि यामागील पार्श्वभूमीही तितकीच अनोखी आहे. कारण विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) हे कितीही मोठ्या पदावर पोहचले असले किंवा कामात जरी असले तरी विलासराव हे त्यांना आलेले फोन स्वत: लगेचच उचलायचे. विलासराव देशमुख यांना लोकांमध्ये राहून त्यांच्याशी संवाद साधायला आवडत असे. ते प्रत्येकांसोबतच शांतपणे न रागवता संवाद साधायचे. त्यांच्या या मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांच्याशी अनेकजण थेट संवाद साधायचे.

त्यांची हीच सवय कायम रहावी आणि इतक्या दिलदार नेत्याचे स्थान महाराष्ट्राच्या मनात कायम राहण्यासाठी देशमुख कुटूंबियांनी विलासराव देशमुख यांचा तो नंबर आजही सुरु ठेवला आहे.  विलासराव (Vilasrao Deshmukh) यांचा ९८२११२५००० हा मोबाईल नंबर अनेकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. फोन लावल्यानंतर त्यांची गाजलेली भाषणे ऐकायला मिळतात. लातूर आणि ग्रामीण भागातील अनेक मंडळी विलासराव देशमुख यांना थेट फोन करत . त्यामुळे विलासरावांबद्दलचं लोकांच्या मनात असणारं हे प्रेम पाहून त्यांचा हा मोबाईल नंबर आजही सुरु ठेवण्यात आलाय.


हे सुद्धा वाचा :

भाजप नेत्यांनी विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाणांचा उदो उदो करावा, देवेंद्र फडणविसांचा काहीच संबंध नाही !

Video : मुख्यमंत्री विलासराव देशमुख नारायण राणेंना म्हणाले होते, ‘नवी नवरी’

मुख्यमंत्री विलासराव देशमुख नारायण राणेंना म्हणाले होते, ‘नवी नवरी’

अमोल कोल्हेंनी विलासराव देशमुख यांच्यासोबतच्या आठवणींना दिला उजाळा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ‘लय भारी’च्या नव्या लोगोचे अनावरण, चव्हाण यांनी केले तोंड भरून कौतुक

Pratiksha Pawar

Recent Posts

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

1 min ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

1 hour ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

3 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

3 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

4 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

4 hours ago