संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला मुंबईतील फ्लोरा फाऊंटन येथे झालेल्या विशाल मोर्चाने मोठी ताकद दिली. मराठी माणसांची संयुक्त महाराष्ट्रासाठीची एकजुट होण्यास तोच मोर्चा आणि आजचा दिवस म्हणजे 21 नोव्हेंबर 1956 हाच दिवस कारणीभूत ठरला. संयुक्त महाराष्ट्रासाठी उभारलेल्या लढ्यात 107 जणांनी आपलं बलिदान दिलं. त्यामुळे, मराठी माणसांचं मुंबईसह महाराष्ट्राचं स्वप्न सत्यात उतरलं आणि 1 मे 1060 रोजी महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य निर्माण झालं. याच घटनेची आठवण करून देणारे एक ट्विट महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शेअर केले आहे.
“महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याच्या निर्णयाविरूद्ध महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याच्या निर्णयाविरूद्ध आजच्याच दिवशी 1956 साली फ्लोरा फांऊटनला मोठा मोर्चा निघाला,ज्यावर दडपशाहीने गोळीबार होऊन अनेकांना हौतात्म्य आलं.रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईला जपणं, संयुक्त महाराष्ट्राचं खच्चीकरण होऊ न देणं हे आपलं कर्तव्य आहे!”, अशा शब्दात शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आजच्या दिवसाची आठवण करुन दिली.
हे सुद्धा वाचा
Supriya Sule : ‘श्रद्धा हत्याकांडाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करा!’ सुप्रिया सुळेंची मागणी
Solapur Mahanagarpalika : महिला आयुक्तांनी स्वीकारला सोलापूर महापालिकेचा पदभार
Cricket News : बाबो! वनडे सामन्यांत 277 धावा; धोनीच्या शिलेदारानं एकाच खेळीत मोडले अनेक विक्रम
आदित्य यांनी फ्लोरा फाऊंटन येथे जमलेल्या गर्दीचा आणि हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाचा फोटो शेअर करत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आठवण करुन दिली आहे. सध्या महाराष्ट्रापासून मुंबई वेगळा करण्याचा डाव घातल्याचा आरोप शिवसेनेकडून सातत्याने होतो. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी हे ट्विट करत मुंबई वेगळी करण्याचा कट रचणाऱ्यांना ईशारा दिला असल्याचे भाकित वर्वण्यात येतं आहे.
दरम्यान, आजच्या दिवशी म्हणजे 21 नोव्हेंबर 1956 रोजी सकाळपासूनच फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने पेटून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्यावर जळजळीत निषेध होत होता. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे “दिसताक्षणी गोळ्या” घाला असे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या.
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…