मुंबई

Breaking : राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख रुग्णालयात दाखल, ‘चक्कर’चे झाले निमित्त

ईडीच्या कचाट्यात सापडलेले राष्ट्रवादी काॅंग्रेस नेते अनिल देशमुख सध्या तुरुंगवास भोगत आहेत, दरम्यान आज यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. अनिल देशमुख तुरुंगात चक्कर येऊन पडल्याने त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी त्यांचा रक्तदाब वाढल्याचे सांगण्यात येत असून अनेक दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत असल्याचे सुद्धा समोर आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनी लाॅंन्डरींग केल्याप्रकरणी ईडीने त्यांच्या अनेक मालमत्तेवर छापे मारून असून याप्रकरणात त्यांना अटक करण्यात आली. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये देशमुख यांची गणना होत असली तरीही कारवाईमुळे सध्या देशमुखांचे राजकीय कामकाजाला फुलस्टाॅप लागल्याचे दिसत आहे.

आज सकाळी 11 च्या सुमारास अनिल देशमुख यांना तुरुंगात चक्कर आले आणि ते जागीच कोसळले. देशमुख यांना चक्कर आल्याचे कळताच तुरुंगातील कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. डाॅक्टरांना बोलावून अनिल देशमुख यांना तपासण्यात आले. तपासणीवेळी देशमुखांचे रक्तदाब वाढल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत काही वेळात जे जे रुग्णालयात देशमुख यांना दाखल करण्याता निर्णय घेण्यात आला. आणखी पुढचे दोन – तीन दिवस अनिल देशमुख यांना डाॅक्टरांच्या देखरेखेखाली रुग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 हे सुद्धा वाचा…

International ‘Dog’ Day : इंटरनॅशनल ‘डॉग’ डे म्हणजे कुत्र्यांच्या प्रामाण‍िक पणाचा गौरव

Kishori Pednekar : ‘मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेच जिंकणार’

Shiv Sena : शिवसेनेला मिळाली संभाजी ब्रिगेडची साथ

कायम रुबाबात वावरणारे अनिल देशमुख यांची शारीरिक स्थिती ढासळली आहे, ते पुरते खंगल्याचे दिसून येत असल्याने अनेकांना धक्का बसत आहे. पैशाचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने राष्ट्रवादीतील एक खंदा नेता बाजूला सारला गेल्यासारखे अनेकांना वाटत आहे. भाजपमधील किरीट सोमय्या यांनी आवाज उठवत अनिल देशमुखांच्या आर्थिक गैरव्यवहाराची बाब निदर्शनास आणली होती, त्यानंतर नवाब मलिक आणि संजय राऊत यांचा सुद्धा लागोपाठ नंबर लागला आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.

दरम्यान अनिल देशमुख यांना नेमका कोणता त्रास होत आहे याबाबत अद्याप कोणतीच माहिती उपलब्ध नाही परंतु अनेक दिवस छातीत दुखत असल्याची तक्रार करून सुद्धा इतके दिवस याकडे का दुर्लक्ष करण्यात आले असा सवाल या निमित्ताने समोर येऊ लागला आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

2 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

3 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

3 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

3 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

4 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

5 hours ago