मुंबई

भारतात ‘नैरोबी फ्लाय’ माशीची दहशत

टीम लय भारी

मुंबई : एका छोट्या माशीने सध्या भारतातल्या काही राज्यात थैमान घातले आहे. ‘नैरोबी फ्लाय’ असे या माशीचे नाव असून या माशीपासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या माशीमुळे डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो, असेही सांगण्यात येत आहे. नैरोबी फ्लाय नावाची ही माशी दिसायला लहान असली तरी तिच्या चावण्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

नैरोबी फ्लाय ही माशी डोळ्यावर बसली तर तिच्या चावण्याने डोळ्याची दृष्टी देखील कमी होऊ शकते. इतकेच नाही तर ही माशी अंगावर बसली किंवा चावली तर शरीराच्या त्या भागावर गंभीर दुखापत देखील होऊ शकते. त्यामुळे या माशीपासून सावध राहा असेही सांगण्यात आले आहे.

ही माशी चावल्यानंतर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर बसल्यानंतर शरीराचा तो भाग लालसर होण्यास सुरूवात होऊन जळजळ व्हायला लागते. त्यामुळे, ही मध शरीरावर बसल्यास तिला हळुवार काढून टाकावे, पण त्या माशीला मारून टाकू नये. या माशीला मारल्यास त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. या माशीपासून संरक्षण करण्यासाठी घर आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा.

ही माशी चावल्यामुळे बिहारमधील अनेक लोकांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे बिहारमधील लोकांमध्ये या माशीची दहशत निर्माण झाली आहे. या मशीन अद्याप महारष्ट्रात शिरकाव केलेला नाही. त्यामुळे सध्यातरी महाराष्ट्र या माशीपासून सुरक्षित आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मार्गे ही माशी किशनगंज जिल्ह्यातील काही भागात दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :

नगर परिषद निवडणुकीबाबत ओबीसी उमेदवारांना मिळाला दिलासा

‘सिंग, डान्स अॅंड प्रे’ चरित्रात्मक ग्रंथाचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

नेमका कधी जाहीर होणार CBSE बोर्डाचा निकाल ?

पूनम खडताळे

Recent Posts

नाशिक जळगाव जिल्ह्यातील आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे घरात झोपलेल्या आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण (baby abducted) झाल्यानंतर काही दिवसांतच अपहरण…

57 mins ago

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटी येथे हातगाडीला आग

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटीत (State Bank Chowk Chowpatty) मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हातगाडीला लागलेली आग…

1 hour ago

नाशिक इगतपुरी तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश

इगतपुरी तालुक्यात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह (child marriage) रोखण्यात बाल आयोगाला यश(Success in…

3 hours ago

मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात

मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) चांदवड मार्गावर भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. अनेक जण…

3 hours ago

उन्हाळ्यात गूळ खाण्याचे फायदे

गुळामध्ये ( jaggery) व्हिटॅमिन बी 12, बी 6, लोह, खनिजे आणि जीवनसत्वे असतात. आपली रोगप्रतिकारक…

3 hours ago

पिंपळगाव येथे महिन्याभरात सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याची उलाढाल ठप्प

एप्रिल महिन्यात पिंपळगाव बाजार समितीत सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याचे (onions) आवक होत असते. महिन्याभरापासून…

3 hours ago