मुंबई

‘मोडक सागर’ आणि ‘तानसा धरण’ ओव्हरफ्लो

टीम लय भारी

मुंबई : गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. मात्र अशातच मुंबईकरांसाठी एक मोठा दिलासा देणारी माहिती समोर आलीआहे. पाणलोट क्षेत्रातील संततधार आणि मुसळधार पावसामुळे 10 दिवसांत मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांच्या एकत्रित पाणीसाठ्यात पाच पटीने वाढ झाली आहे. 5 जुलै रोजी नोंदवलेला पाणीसाठा 14,76 टक्के होता. तो आता 74,82 टक्क्यांवर पोहोचला आहे. असे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे शेजारच्या ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर आणि तानसा ही दोन धरणे गुरुवारी ओसंडून वाहू लागली.

मुंबई महानगराला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या सर्व तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.36,61,133 दशलक्ष लिटर प्रतिदिन एमएलडी साठवण क्षमता असलेले मोडक सागर बुधवारी दुपारपासून ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात झाली. तर 96,894 एमएलडी साठवण क्षमता असलेले तानसा धरण गुरुवारी संध्याकाळपासून ओव्हरफ्लो झाले. या जलाशयांची एकत्रित पाणी साठवण क्षमता 14,47,363 एमएलडी आहे. या ठिकाणांहून शहराला दररोज 3,850 एमएलडी पिण्यायोग्य पाणी पुरवठा केला जातो.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेजारच्या ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर आणि तानसा ही दोन धरणे गुरुवारी ओसंडून वाहू लागली. महानगरपालिका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या पंधरवड्यात पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सात पैकी दोन धरणे गेल्या 48 तासांत ओसंडून वाहू लागली आहेत.

हे सुध्दा वाचा:

विधीमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले

जनसेवेसाठी सदैव कटीबद्ध राहीन- धनंजय मुंडे

आता सभागृहात ‘हे‘ शब्द बोलण्यास बंदी

रूपाली केळस्कर

Recent Posts

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

2 mins ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

8 mins ago

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ?; देवेंद्र फडणवीस

हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

32 mins ago

‘मदत फाऊंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम, पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था

'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…

46 mins ago

आदित्य ठाकरेंचे काम,श्रेय लाटताहेत राहुल शेवाळे !

लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले. चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली…

50 mins ago

नरेंद्र मोदी देशभर ४०० पारच्या घोषणा देत फिरत होते, पण २०० पार होणे सुद्धा त्यांना जड जाणार आहे: रमेश चेन्निथला

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भाजपचे प्रचारक बनून ४०० पारच्या घोषणा ('400 par' slogans) देत…

1 hour ago