टीम लय भारी
जगन्नाथ पुरी:आज भारतीतील सर्वांत जूनी आणि सुप्रसिध्द जगन्नाथ पुरीची यात्रा सुरु झाली आहे. भगवान जगन्नाथ रथयात्रेसाठी भारतभरातून लाखोंच्या संख्येने नागरीक हजेरी लावतात. जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेचे एक वैशिष्य आहे ते, म्हणजे तथे मिळणारा प्रसाद होय.यात्रा काळात लाखो लोकांना प्रसादाचे वाटप केले जाते.लाखो लोकांचे जेवण बनविण्यासाठी सुमारे 500 आचारी काम करतात. भगवान जगन्नाथांना सहा वेळा भोग दाखवला जातो. 56 प्रकारच्या पदार्थांचा भोग दाखवला जातो. भोग दाखवल्यानंतर हा प्रसाद मंदिराच्या परिसरातील आनंद बाजारमध्ये विकला जातो.
जगन्नाथ मंदिरचे स्वयंपाक घर 11 व्या शतकातले असून, राजा इंद्रवर्माने ते बांधले आहे. त्यानंतर दुसरे स्वयंपाक घर 1682 ते 1713 च्या दरम्यान राजा दिव्य सिंहदेवने बनवली.या ठिकाणी काही आचारी पिढयान पिढया जेवण बनविण्याचे काम करत आहेत. महाप्रसाद बनविण्यासाठी मातीच्या भांडयांचा वापर केला जातो. गोड पदार्थ गुळापासून बनविले जातात. कोराना महामारीच्या काळात दोन वर्षे ही यात्रा बंद होती. यावर्षी यात्रेकरुंचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
हे सुध्दा वाचा:
बंडखोरीचे राजकारण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लावारीस गटाचे पालकत्व कोणाकडे?
हो ! राजकारणात काहीही घडू शकतं
उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…
गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…
दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…
या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…
फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…