राष्ट्रीय

Ghulam Nabi Azad Resigns : देशात काँग्रेसला मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसला रामराम

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तर देशात देखील काँग्रेस गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्ष कमकुवत झालेला पाहायला मिळत आहे. पण आता काँग्रेसच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेसला रामराम केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज (ता. 26 ऑगस्ट) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासोबतच त्यांना पक्षाकडून देण्यात आलेल्या इतर पदांचा देखील राजीनामा (Ghulam Nabi Azad Resigns) दिलेला आहे. याआधी सुद्धा गुलाम नबी आझाद यांनी त्यांना पक्षाकडून देण्यात आलेल्या जम्मू-काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या अध्यक्ष पदाचादेखील राजीनामा दिला होता. महत्वाची बाब म्हणजे पक्षाकडून त्यांची त्यावेळी त्या पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत काही तासांतच पदाचा राजीनामा दिला होता.

काँग्रेस पक्षाला ज्येष्ठ नेतेच सोडून जात असल्याने भविष्यात काँग्रेस पक्षाला खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गुलाम नबी आझाद यांच्याआधी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसवर नाराज होऊन पक्ष सोडल्याचे त्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पात्रात म्हंटले आहे.

गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांना पाच पानांचे राजीनामा पात्र लिहून पाठवेल आहे. या पत्रात गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावूक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचे माझं 50 वर्षांचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस जोडो यात्रा काढावी,’ असा सल्ला या पात्राच्या माध्यमातून गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी आणि पक्षाला दिला आहे.

हे सुद्धा वाचा

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी संपेनात, निवडणूक पत्रावरून होणार चौकशी

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी भाजपची नवी खेळी

Maharashtra Assembly Sesssion : एकनाथ शिंदे यांची खेळी, विधिमंडळ सभागृहात बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र !

राहुल गांधी यांच्यावर गुलाम नबी आझाद यांनी या पत्राच्या मध्यमातून हल्ला चढवला आहे. ‘तुमच्या नेतृत्वाखाली पक्ष चांगली कामगिरी करत आहे. पण दुर्दैवाने राहुल गांधी यांचा पक्षप्रवेश झाल्यापासून, विशेषत: 2013 नंतर तुम्ही राहुल यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर, त्यांनी पक्षातील चर्चेची संपूर्ण ब्लू प्रिंटच उद्ध्वस्त करुन टाकली आहे. सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला करण्यात आलं. तर अननुभवी नेते पक्षाचा कारभार पाहू लागले.’ असे गुलाम नबी आझाद यांच्याकडून या पात्रात लिहिण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे काँग्रेस पक्षावर तीव्र नाराज असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसला यामुळे आणखी किती धक्के सहन करावे लागतात ? हे पाहावे लागणार आहे.

पूनम खडताळे

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

2 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

3 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

3 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

4 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

4 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

6 hours ago