टीम लय भारी
रांची: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देवघर विमानतळाचे उध्दाटन केले. या विमानतळामुळे झारखंडचा विकास होण्यास मदत होणार आहे. झारखंडच्या जनतेला व्यवसाय मिळणार आहे. बेरोजगारांना काम मिळणार आहे,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
विमानतळ उदघाटनानंतर पंतप्रधान मोदींनी एम्स रुग्णालयाचे उध्दाटन केले. हे रुग्णालय 250 खाटांनी सुसज्य करण्यात आले आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैधनाथधामला भेट दिली. यावेळी त्यांनी बैधनाथांची पूजा केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवघर महाविदयालयात सभा घेतली. आज त्यांनी कालीमातेची देखील पूजा केली.
केंद्रीय दळणवळण मंत्री सिंधिया यांनी या विमानतळाचा लाखो श्रध्दाळूंना फायदा होईल असे म्हटले आहे. पूर्वी मोठया शहरांमध्ये विमानतळ बनत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याची परिभाषा बदलली.ज्यातिरादित्य सिंधीया देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यापूर्वी त्यांनी व्टिटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. ‘देवघरच्या हवेमध्ये आज वेगळा सुगंध आहे. बैधनाथ बाबांच्या पावन धरतीला शतशः नमन‘.
देवघर, पटना, दिल्ली तसेच देवघर रांची कोलकाता अशी विमानसेवा लवकरच सुरु होईल.मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले की, झारखंडसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. केंद्राच्या मदतीने झारखंडचा विकास होत आहे. झारखंडच्या नागरिकांमध्ये या विमानतळाच्या उध्दाटनामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले
हे सुध्दा वाचा:
स्त्री लंपट भाजप नेत्याची अखेर हकालपट्टी !
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहे. तर…
ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या,…
अनेकदा सामान्य माणूस कर नियोजन, करभरणा, कर बचत, लेखापरीक्षण, बदलते कायदे यांच्यापासून लांब राहणे पसंत…
कोरोना काळात राज्य सरकारने माफ केलेला व्यवसाय कर वसुलीसाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून तगादा लावला जात…
कर्नाटक राज्यातील हुबळी येथे एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. या निषेधार्थ महाराष्ट्र वीरशैव सभा…
गोदावरी नदीला येणाऱ्या पुराची तीव्रता कमी करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर पुलाखाली स्वयंचलित मॅकेनिकल गेट (Mechanical gates)…