राष्ट्रीय

Security of India : भारताची सुरक्षा धोक्यात, धमकी देणारा IS चा दहशतवादी रशियात सापडला

भारताला दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे तपास यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मात्र एक दहशतवादी भारता बाहेर सापडला असल्याने आर्श्चयाचा धक्का बसला आहे. रशियामध्ये सोमवारी इस्लामिक स्टेट म्हणजे IS चा एक दहशतवादी सापडला आहे.‍ रशियाच्या सुरक्षा एजन्सीने त्याला ताब्यात घेतले आहे. हा सुसाईड बॉम्बर भारतात धमाका उडवून देण्याच्या तयारीत होता. त्याच्या निशाणावर भारतातील मोठे नेते होते. म‍िळालेल्या माहितीनुसार रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्विस म्हणजे FSB ने या दहशतवादयाला पकडले आहे.

तो मध्यआशिआई देशांमधला रह‍िवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला भारतामध्ये हल्ला करण्यासाठी रशिया सोडून जाण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे भारतावर दहशवादी हल्ले होण्याची शक्यता वाढली आहे. यावर केंद्र सरकार कोणती पावले उचलते आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चार दिवसांपूर्वी मुंबईमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणणार असल्याची धमकी मुंबई पोलिसांना देली होती. त्या पर्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.‍ त्यानंतर मुंबई पोलिसांनी एका संशयिताला विरार मधून ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

Chhagan Bhujbal :छगन भुजबळ यांनी डासांवरुन तानाजी सावंत यांना चांगलेच कोंडीत पकडले

Vinayak Mete :अखेर विनायक मेटेंच्या अपघातानंतर सरकार जागे झाले

Sanjay Raut : संजय राऊतांचा कोठडी मुक्काम वाढला

तसेच मागच्या आठवडयात हर‍िहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर एक शस्त्र अस्त्र असलेली बोट सापडली आहे. त्याचा तपास सुरु आहे. ती ऑस्ट्रेल‍ियन नागरिक असलेल्या महिलेची आहे असे सांगण्यात येत आहे. मात्र असे असले तरी गाफील राहून चालणार नाही. कारण आपल्या राज्यात अनेक वेळा दहशवादी हल्ले यापूर्वी झाले आहे. 1993, 26/11 हे मोठे हल्ले मुंबईवर यापूर्वी झाले आहेत. मुंबईत ज्या प्रकारचे हल्ले झाले तसे हल्ले देशाच्या इतर भागात होण्याची शक्यता देखील नकारता येत नाही. आपल्याला देशातील नेत्यांना वाटते की, केवळ पाकिस्तान हाच आपला शत्रू आहे. परंतु जगभरातील अनेक देशांमध्ये दहशतवादाची पाळंमुळं खोलवर रुजलेली आहेत ही गोष्टी दुर्लक्षीत करुन चालणार नाही.

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला हल्ला देखील संपूर्ण जगाला हदरवून सोडणारा होता. आपल्या राज्यात सत्ता संघर्ष विकोपाला गेला आहे. त्यामुळे राज्याचा गाडा डळमळीत झाला आहे. त्याच परिस्थतीचा फायदा ते उठवू शकतात. आपण आपसात भांडत बसलो आहोत. केंद्रात बसलेले भाजप सरकार देशातील अनेक राज्यात आपल्याला हातपाय कसे पसरता येतील याची रणनिती आखण्यात मग्न आहे. त्यामुळे शत्रू कधीही घातपात करु शकतो हे सत्ताधाऱ्यांनी विचारात घ्यायला हवे.

रूपाली केळस्कर

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

7 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

7 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

8 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

8 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

10 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

10 hours ago