क्रीडा

इंग्लंडचा पाकिस्तानवर विजय पण फायदा मात्र टीम इंडियाला, वाचा संपूर्ण समीकरण

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 74 धावांनी विजय मिळवला. इंग्लिश संघाच्या या विजयाचा टीम इंडियाला खूप फायदा झाला आहे. आता टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याच्या शर्यतीत सामील झाली आहे. वास्तविक, पाकिस्तानच्या पराभवानंतर टीम इंडियाला आता बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करायचा आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत एक सामना जिंकावा लागेल. भारतीय संघ सध्या 52.08 गुणांसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे आता संभाव्य सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात धडक मारू शकते.

टीम इंडिया फायनलमध्ये कशी पोहोचेल
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला बांगलादेशविरुद्धची आगामी दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकावी लागणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत संघाला एक सामना आपल्या नावावर करावा लागेल. दुसरीकडे, समीकरणांनुसार, ऑस्ट्रेलियन संघाने सध्याच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजचा व्हाईटवॉश केला आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकली, तर संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.

हे सुद्धा वाचा

अशा वातावरणात त्यांनी येथे येऊ नये अन्यथा…, बोम्मईंचा पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला इशारा

इंदू मिलवरील स्मारक लवकरच पूर्ण होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महापरिनिर्वाण दिनी ग्वाही

बाबरी मशीद वादावरून अयोध्येत कडेकोट बंदोबस्त

भारतीय संघाला सध्या 52.08 टक्के गुण आहेत, जर टीम इंडियाला एकही डिमेरिट गुण मिळाला नाही तर तो 68.05 गुणांवर पोहोचू शकतो. अंतिम फेरी गाठण्यासाठी हे अनेक गुण टीम इंडियासाठी पुरेसे ठरू शकतात. मात्र, भारताला बांगलादेशविरुद्धची आगामी कसोटी मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची मायदेशातील कसोटी मालिका जिंकावी लागणार आहे.

इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला होता
यजमान पाकिस्तानला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 74 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. अशाप्रकारे इंग्लंडचा संघ 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पुढे गेला आहे. पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी 342 धावांची गरज होती, पण यजमानांचा संघ 268 धावांत गुंडाळला गेला. अशा प्रकारे बेन स्टोक्सच्या संघाने हा सामना 74 धावांनी जिंकला.

आता या पराभवानंतर पाकिस्तानी संघाच टेन्शन वाढलं आहे. शिवाय त्यांचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत धजक मारण्याचे स्वप्न देखील भंग पावण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता भारत विरुद्ध पाकिस्तान असा कसोटी सामना पाहण्यासाठी आतुर असलेल्या क्रिकेट चाहत्यांचा देखील हिरमोड झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रणव ढमाले

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

9 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

11 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

11 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

13 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

13 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

14 hours ago