केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून एकामागून एक धाडी हे महाराष्ट्रावरचं दिल्लीचं झाकलेलं आक्रमण आहे. पण अशा कितीही धाडी किंवा कारवाया केल्या तरी महाराष्ट्र काही या कारवायांसमोर झुकणार नाही, थांबणार नाही, असा पलटवार शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्रं सरकारवर केला आहे.
पुढे ते असे म्हणाले, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरुद्ध शिवसेना वातावरण चांगलंच तापलं आहे. परस्परांवर आरोप प्रत्यारोप, तर कधी ईडी च्या धाडी हे असे राजकारण सुरू आहे. यात आता आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाने छापा मारला. या विषयावर आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारला खडे बोल सुनावले.
हे सुद्धा वाचा
आदित्य ठाकरे यांची संकल्पना, शिवाजी पार्कमध्ये भरणार भव्य ऐतिहासिक प्रदर्शन!
आदित्य ठाकरेंचा पुढाकार, मुंबईतील सहा किल्ल्यांचे भाग्य उजळणार
हिजाबच्या वादावर आदित्य ठाकरे यांचे सूचक वक्तव्य
Maha: IT raids on premises of bizmen ‘linked’ to Aaditya Thackeray, Anil Parab
आदित्य ठाकरे म्हणतायत, महाराष्ट्रावर आधीही आक्रमक आहे. आता हे दिल्लीतून आक्रमण होतंय. जेव्हापासून इथे निवडणूक लागेल आणि महाविकास आघाडीची भीती वाटू लागलीय, तेव्हापासून हे सुरु आहे. हे यूपी, हैदराबाद, बंगालमध्ये केलेलं. आता महाराष्ट्रात सुरु आहे. सगळ्या सेंट्रल एजन्सीज या भाजपच्या प्रचार यंत्रणा झाल्या आहेत. महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणारही नाही, असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी केला.
मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…
मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…
अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…
फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…