टीम लय भारी
मुंबई: आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय विश्वासू सहकारी आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने धडत टाकली. हे प्रकरण समजताच आदित्य ठाकरे आपली प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मांडली.(Aditya Thackeray’s counterattack)
केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून एकामागून एक धाडी हे महाराष्ट्रावरचं दिल्लीचं झाकलेलं आक्रमण आहे. पण अशा कितीही धाडी किंवा कारवाया केल्या तरी महाराष्ट्र काही या कारवायांसमोर झुकणार नाही, थांबणार नाही, असा पलटवार शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्रं सरकारवर केला आहे.
पुढे ते असे म्हणाले, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरुद्ध शिवसेना वातावरण चांगलंच तापलं आहे. परस्परांवर आरोप प्रत्यारोप, तर कधी ईडी च्या धाडी हे असे राजकारण सुरू आहे. यात आता आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाने छापा मारला. या विषयावर आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारला खडे बोल सुनावले.
हे सुद्धा वाचा
आदित्य ठाकरे यांची संकल्पना, शिवाजी पार्कमध्ये भरणार भव्य ऐतिहासिक प्रदर्शन!
आदित्य ठाकरेंचा पुढाकार, मुंबईतील सहा किल्ल्यांचे भाग्य उजळणार
हिजाबच्या वादावर आदित्य ठाकरे यांचे सूचक वक्तव्य
Maha: IT raids on premises of bizmen ‘linked’ to Aaditya Thackeray, Anil Parab
आदित्य ठाकरे म्हणतायत, महाराष्ट्रावर आधीही आक्रमक आहे. आता हे दिल्लीतून आक्रमण होतंय. जेव्हापासून इथे निवडणूक लागेल आणि महाविकास आघाडीची भीती वाटू लागलीय, तेव्हापासून हे सुरु आहे. हे यूपी, हैदराबाद, बंगालमध्ये केलेलं. आता महाराष्ट्रात सुरु आहे. सगळ्या सेंट्रल एजन्सीज या भाजपच्या प्रचार यंत्रणा झाल्या आहेत. महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणारही नाही, असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी केला.