टीम लय भारी
मुंबई : ‘महाविकास आघाडी’ सरकार अडचणीत आल्याचे चित्र विरोधकांकडून रंगविले जात आहे. पण त्यात बिल्कूल तथ्य नाही. कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. त्यासाठी काँग्रेसने नवी दिल्लीहून तज्ज्ञांची मदत घेतली आहे. कायदेशीर लढाई जिंकून आमचे सरकार टिकून राहील, असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, सध्याच्या राजकीय स्थितीवर आम्ही काम करीत आहोत. सरकारी काम सुद्धा सुरू आहे. काल मी मंत्रालयात चार तास काम करीत होतो. प्रत्येक मंत्री आपापल्या खात्याचे काम सांभाळत आहेत. राज्याचा कारभार सुरळीत सुरू आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीतही जनतेची कामे सुरळीत सुरू ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे थोरात म्हणाले.
हे सुद्धा वाचा :
‘एकनाथ शिंदेंकडून भाजपला अद्याप कोणताही प्रस्ताव नाही’
‘आमदारांना अधिकाऱ्यांच्या बदल्यांतून मलिदा मिळाला नाही म्हणून ते फुटले’
दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक…
मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताची गगनाला गवसणारी प्रगती झाली असून आज जगभरात भारताचे मान उंचावली आहे…
लोकसभेची निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी असून मोदी पुन्हा सत्तेत आले तर राज्यघटना बदलून…
भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना ( Prajwal Revanna ) याने अनेक…
काँग्रेसने ( Congress) देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची…
संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स (Colors Marathi) मराठी आता नव्या रूपात हे वर्ष साजरे करायला…