टीम लय भारी
मुंबई : बंडखोर आमदारांनी स्वतंत्र गट स्थापून त्याला वेगळे नाव दिले आहे. परंतु जोपर्यंत कायदेशीर मान्यता मिळत नाही, तोपर्यंत अशा गटाला काहीही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडून अशा गटाच्या बाबतीत काय निर्णय घेतला जाईल ते पाहणे महत्वाचे आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत आहे. आमदारांनी बंडखोरी केली. त्यांनी शिवसेनेसोबत निष्ठा ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे शिवसैनिक व स्थानिक जनता नाराज आहे. आमदारांनी फसविल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. त्यातून स्थानिक पातळीवर काही घटना घडलेल्या असू शकतील. पण त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.
भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आम्ही सन २०१९ मध्ये ‘महाविकास आघाडी सरकार’ स्थापन केले होते. आम्ही तिन्ही पक्ष आजही एकत्र आहोत. शिवसेनेत जे काही सुरू आहे, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. हा प्रश्न मुख्यमंत्री व्यवस्थित हाताळत आहेत.
हे सुद्धा वाचा :
‘एकनाथ शिंदेंकडून भाजपला अद्याप कोणताही प्रस्ताव नाही’
‘आमदारांना अधिकाऱ्यांच्या बदल्यांतून मलिदा मिळाला नाही म्हणून ते फुटले’
महाराष्ट्रातील तरुणांना शासकीय सेवेत दाखल होण्याची सुवर्णसंधी !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…
हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…
नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…
एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…
उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…