राजकीय

दिंडोरी लोकसभेतून माकपचे जे पी गावित घेणार माघार

दिंडोरी लोकसभा मतदार संघात सीपीएमचे उमेदवार जे. पी. गावित (J P Gavit) यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. भाजपा काही ठिकाणी कंत्राटी उमेदवार उभे करत असल्याचे राष्ट्र वादी चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. परंतु काहींनी या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावत गावित यांच्याशी सबंध जोडला. गावित यांनी शरद पवार यांची जळगाव येथे भेट घेतली. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या संदर्भात गावितांसंदर्भाने हे विधान अजिबात नव्हते , अशा आशयाचे लेखी पत्र देत गावितांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.(CPI(M)’s J P Gavit to withdraw from Dindori Lok Sabha seat)

या संदर्भात पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड , माजी आमदार शिरीष कोतवाल, माजी आमदार नितीन भोसले, पक्ष निरीक्षक तिलोत्तमा पाटील,ज्येष्ठ नेते गजानन शेलार , तुषार पवार आदी उपस्थित होते.

दिंडोरी लोकसभा मतदार संघात सत्ताधारी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा सामना करताना राष्ट्रवादी पवार गटाने भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, इंडिया आघाडीतील घटकपक्ष म्हणून दिंडोरी लोकसभेची जागा सीपीएमसाठीच सुटावी, अशी इच्छा माजी आमदार जे.पी. गावित यांची होती. मात्र , जागावाटपांच्या निर्णयात ही जागा राष्ट्रवादीच्या पवार गटाकडे गेल्यानंतरही जे.पी. गावित यांनी उमेदवारीसाठी अर्ज भरला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भगरे यांचा अर्ज भरतेवेळी केलेले विधान सर्वच माध्यमांमध्ये विशेष चर्चिले गेले होते. त्या विधानाचा संबंध काही जणांनी गावित यांच्याशी जोडल्यानंतर गावित यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत जळगांव येथे शरद पवार यांची भेट घेत भूमिका मांडली होती. यावर शरद पवार यांनी पत्राद्वारे गावित यांच्या पक्ष व विचारांच्या निष्ठेविषयी कुठलीही शंका नसल्याचा निर्वाळा पत्रातून दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गावित हे इंडिया आघाडीचे घटकपक्ष म्हणून निवडणूक रिंगणातून माघार घेत राष्ट्रवादीस साथ देतील, असा विश्वास पत्रकार परिषदेत सहभागी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

10 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

12 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

12 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

13 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

14 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

15 hours ago