लय भारी न्यूजनेटवर्क
नागपूर : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सहा महीने चालेल असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याबाबत पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना सवाल केला. त्यावेळी पवारांनी फडणवीसांना टोला लगावला. मी फडणवीसांना ओळखतो, पण ते ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी आहेत, हे मला आताच कळलं, अशी कोपरखळी पवार यांनी मारताच पत्रकार परिषदेत एकच हंशा पिकला.
शरद पवार हे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी नागपूर येथील रवी भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी विविध विषयांवर भाष्य केले.
राज्यात मध्यवर्ती निवडणुका होणार नाहीत. राज्यात स्थिर सरकारच स्थापन होईल. हे सरकार पाच वर्षे चालेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पुन्हा येणार असं म्हणत टोला लगावला.
राज्यातील एकसूत्री कार्यक्रम ठरवण्यावर सध्या चर्चा सुरू आहेत. सध्या फॉर्म्युलावरही चर्चा सुरू असून ती प्राथमिक टप्प्यात आहे. ज्यावेळी त्यावर काही ठोस निर्णय होईल, त्यावेळी फॉर्म्युला सर्वासमोर उघड केला जाईल,” असे पवार यावेळी म्हणाले.
हे सुद्धा वाचा
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी अधिकाऱ्याने केली 100 किमी सपत्निक पदयात्रा
राज ठाकरेंनी रूग्णालयात जाऊन लता मंगेशकरांच्या तब्येतीची केली चौकशी