राजकीय

हनुमान जन्मस्थळ कर्नाटकात; योगी आदित्यनाथांच्या वक्तव्यानंतर जन्मस्थळाचा वाद पुन्हा उफाळणार ?

सध्या कर्नाटक निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान जन्मस्थळ कर्नाटकात असल्याचे वक्तव्य केल्याने नाशिकच्या महंतांमध्ये नाराजी पसरली आहे. योगींनी हनुमान जन्मस्थळ कर्नाटकात असल्याचे वक्तव्य प्रचारादरम्यान केले होते. त्यावर नाशिकच्या साधू महंतांनी आक्षेप घेत योगींनी धर्मात राजकारण करु नये असा सल्ला दिला आहे.

कर्नाटक निवडणूकीच्या प्रचाराला दिवसेंदिवस धार चढत असून भाजपच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ देखील मैदानात उतरले आहेत. तेथील एका प्रचारसभेत बोलताना योगींनी हनुमान जन्मस्थळ कर्नाटकात असल्याचे म्हटले. त्यानंतर नाशिकच्या साधू महंतांनी योगींच्या वक्तव्याला कडाडून विरोध केला. कर्नाटक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर योगींनी वक्तव्य केल्याचे नाशिकच्या महंतांनी म्हटले आहे.

काही दिवसांपू्र्वी हनुमान जन्मस्थळावरुन वाद देखील उत्पन्न झाला होता. त्यावेळी धर्मपीठांच्या महंतांची धर्मसभा देखील झाली. या धर्मसभेत अंजनेरी येथे हनुमान जन्मस्थळ असल्याच्या चर्चांवर विचारमंथन झाल्यानंतर अयोध्येतील आचार्य गंगाधर पाठक यांनी अंजनेरी हेच जन्मस्थळ असल्यावर शिक्कामोर्तब केले होते.

हे सुद्धा वाचा

बारसू प्रकल्पाबाबत चर्चेतून मार्ग काढा; शरद पवारांचा उदय सामंतांना सल्ला

अजित पवार म्हणाले, विरोधक आहे म्हणून काय गचोरीला धरु का ?

महाविकास आघाडी झाली नाही तर २०२४ साठी काँग्रेसचा प्लॅन तयार : नाना पटोले  

अंजनेरी स्थळाला धर्मपीठाचा निर्णय देखील झाला आहे. त्यावर सर्व संमती झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी अशा पद्धतीने विधान करुन दिशाभूल करु नये. योगींनी धर्मात राजकारण करू नये असा सल्ला नाशिकच्या महंतांनी दिला आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’  गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेली मालिका म्हणजे…

13 mins ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

60 mins ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

15 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

17 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

17 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

18 hours ago