राजकीय

कपिल देवसह आणखी एका दिग्गज व्यक्तीला फायनलचं आमंत्रण नाही

देशात आयसीसी क्रिकेट विश्वचषक (ICC World cup 2023) नुकताच पार पडला. या विश्वचषकात टीम इंडियाने केलेल्या कामगिरीचे भारतात नाही तर जगात प्रशंसा केली जात आहे. टीम इंडियाने या विश्वचषकात दहा सामन्यात सलग विजय मिळवला, मात्र अंतिम सामन्यात टीम इंडियाचं गणित चुकल्याने संघाला यंदाच्या वर्षीही विश्वचषकाच्या स्वप्नांपासून लांब राहावे लागले आहे. याच विश्वचषकात वेगवेगळे वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या विश्वचषकात १९८३ सालचा आंतरराष्ट्रीय विश्वचषक विजयी करून देणारे टीम इंडियाचे माजी दिग्गज खेळाडू कपिल देवला (Kapil Dev) अंतिम सामन्यासाठी आमंत्रित केले नाही. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

भारतातील अनेक मान्यवर विश्वचषक पाहण्यासाठी आले होते. त्याचप्रमाणे काही बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते देखील उपस्थित होते. मात्र सर्वप्रथम टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि कर्णधार कपिल देव यांनी १९८३ सालचा विश्वचषक जिंकून दिला होता. मात्र आता कपिल देव यांनाच बीसीसीआयने अंतिम सामन्यासाठी आमंत्रित केले नाही, असे कपिल देव म्हणाले आहेत. यावरून बीसीसीआयच्या आयोजनावर देशभरात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कपिल देवसह आणखी एका दिग्गज व्यक्तीस अंतिम सामन्यासाठी आमंत्रण न दिल्याची माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे.

हे ही वाचा

ठाण्यात कंटेनरवर शिवसेना शाखा

‘तो आमचा गनिमी कावा असणार’; मनोज जरांगेंचं खळबळजनक वक्तव्य

‘समस्या सोडवण्यासाठी सत्ता असते; वाढवण्यासाठी नव्हे’; आव्हडांचा संताप

कपिल देव यांना आमंत्रण नाही

कपिल देव यांना विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी आमंत्रित केलं नाही. कपिल देव यांनी देशासाठी सर्वप्रथम विश्वचषक जिंकून दिला. त्यांना ८३ सालच्या खेळाडूंना विश्वचषक पाहण्यासाठी आमंत्रित करायचे होते. मात्र मालाच आमंत्रण न केल्याचे कपिल देव म्हणाले आहेत. याबरोबर बीसीसीआय आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवारांना देखील आमंत्रित केले नसल्याचे सूत्रांद्वारे माहिती माध्यमांना देण्यात आली आहे. मात्र यावर अजूनही शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

शरद पवारांना देखील आमंत्रण नाही

कपिल देव यांना अंतिम सामन्यासाठी आमंत्रित न केल्याने कपिल देव म्हणाले की, मला हा सामना पाहायचा होता. माझ्यासोबत माझे सहकारी असावेत आणि सामना पाहावा. मात्र आमंत्रण नसल्याने मी गेलोच नाही. मला असं वाटत होतं की अंतिम सामना पाहण्यासाठी १९८३ ची संपूर्ण टीम असेल, मात्र आमंत्रण नसल्याने मी आलो नसून आयोजन मोठे असल्याने काही वेळा लोकं विसरून जात असतील.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago