राजकीय

‘जास्त दिवस घोंगडं भिजवत ठेवलं तर त्याचा वास येणारच’

राज्यात मराठा आरक्षणाचा ( Maratha Reservation) मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मराठा समाजाने सरकारला मराठा आरक्षणाची मागणी केली. मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये विलीन करण्याबाबत मराठा समाजाने सरकारकडे मागणी केली आहे. मात्र ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा ओबीसी (OBC) समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता आरक्षण द्यावं अशी मागणी आहे. अशातच आता भाजपचे नेते माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मराठा समाजाला अजूनही आरक्षण न मिळाल्याने संताप व्यक्त केला आहे. ‘घोंगडं कितीही दिवस जास्त भिजवत ठेवलं तरीही वास येणारचं, असं म्हणत उदयनराजे यांनी सराकारवर निशाणा साधला आहे.

अशातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (manoj jarange-patil) हे अंतरवाली सराटीतून पायी दिंडी करत मुंबईला कूच करणार आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर ते उपोषण करणार आहेत. सरकार केवळ आरक्षणाच्या हुलकावण्या देत असल्याचं मराठा बांधवांचं म्हणणं आहे. मराठा समाजाने आता काही ठिकाणी कुणबी प्रवर्गातील नोंदी शोधायला सुरूवात केल्या आहे. यामुळे आता मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचं म्हणाले आहेत. यावर आता उदयनराजे भोसले यांनी सरकारसह शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले उदयनराजे भोसले 

‘इतर राज्यांप्रमाणे आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात यावी’, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ‘त्यावेळी मंडल आयोगाबाबतीत केलं असतं तर आज ही वेळ आली नसती. आरक्षण मर्यादा वाढवल्याने सहज प्रश्न सुटेल. आरक्षण मर्यादा ७० ते ७२ टक्के करा हाच एक पर्याय आहे’, असं उदयनराजे म्हणाले आहेत.

हे ही वाचा

तरूणाची पुणे ते आयोध्या सायकलवारी

डंकी सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत?

‘नरेंद्र मोदी पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेईल’

मराठा आरक्षण मुद्दा आणि ओबीसींचा विरोध

मराठा समाज अनेक महिन्यांपासून आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र सरकार केवळ आश्वासन देत असल्याचं चित्र पाहायला मिळत असल्याचं मराठा समाजाने सांगितलं आहे. अशातच मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये सामावून घेण्यासाठी मराठा बांधव सरकारकडे मागणी करत आहे. मात्र ओबीसी नेते छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या, अशी मागणी सरकारला करत आहे. मात्र आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण पाहिजे यासाठी राजयभरामध्ये सभा घेत आंदोलन झालं, यानंतर जरांगे मुंबईला पायी दिंडी करत आझाद मैदानावर आरक्षणाची मागणी करणार असल्याचं म्हणाले आहे.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago