राजकीय

आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच, प्रकाश आंबडेकर यांची ग्वाही

निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यातील घडामोडींना नाट्यमयरित्या वेग आला आहे. भाजपने उद्धव ठाकरे गटाला एकामागून एक असे धक्के द्यायला सुरुवात केली आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण चिन्ह उद्धव ठाकरे गटाकडून हिसकावून घेतल्यानंतर विधानभवनातील शिवसेना कार्यालयावरही एकनाथ शिंदे गटाने ताबा मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे यांच्याशी युती तोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अकोला येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘ओबीसी’ परिषदेदरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आंबेडकर यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. (We stand with Uddhav Thackeray)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली होती. सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचे टाळावे चाटले, असे अमित शाह म्हणाले होते. त्याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी अमित शहांचा ‘मोगॅम्बो’ असा उल्लेख केला. याबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले, “राजकारणात अशी टोपण नावे एकमेकांना बहाल केली जातातच. त्यामुळे राजकारणातील खेळकरपणा टिकून राहतो. राजकारण्यांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे. असे माझे वैयक्तिक मत आहे.” सध्या देशातील वैचारिक दहशतवाद सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यासंदर्भाने प्रकाश आंबेडकर यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. ते म्हणाले, राजकारण्यांनी हे सर्व खिलाडीवृत्तीने स्वीकारले पाहिजे. नाही तर याने मला मोगॅम्बो म्हटलं म्हणून त्याला गोळ्या घालायच्या असं व्हायला नको.

विधान भवनातील शिवसेना कार्यालय एकनाथ शिंदेंच्या ताब्यात

 

‘मोगॅम्बो’ अमित शाह 

कोल्हापूरमधील कार्यक्रमात बोलताना अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर उपरोधिक शब्दांत टीका केली होती. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ‘दुध का दुध पाणी का पाणी’ झालं. असे ते म्हणाले होते. अमित शाहांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनीदेखील तितक्याच आक्रमक शैलीत प्रत्युत्तर दिले होते. ते म्हणाले होते, “मोगॅम्बो काल म्हणाला की, मी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले. पण सध्या जे काही राज्यात सुरु आहे, त्यात कोण कोणाचे काय चाटतं आहे? तेच कळायला मार्ग नाही.”

 

हे सुद्धा वाचा

२००० कोटींनी न्याय विकत घेतला ; देवेंद्र फडणवीसही व्यवहारात सामील

तिथे हजर असतो तर संजय राऊतांना मारले असते ; संदीप देशपांडे संतापले

शिवरायांच्या प्रतिमेची तोडफोड, हार कचरापेटीत फेकला ; JNU मध्ये राडा

टीम लय भारी

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

7 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

7 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

8 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

8 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

10 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

10 hours ago