राजकीय

राज्यपाल विशेष अधिवेशन बोलावतील का?

टीम लय भारी

पुणे : राज्यात तयार झालेल्या सत्तापेचामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार मुख्यमंत्री कोण बनणार, हे 11 तारखेनंतरच स्पष्ट होईल. घटनेतील तरतूदीनुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विशेष अधिवेशन बोलावू शकतात. राज्यपालांनी 11 तारखेच्या आत अधिवेशन बोलावणे हे घटना बाह्य आहे, असे मत ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले.

विशेष अधिवेशन बोलावून राज्यपालांना फ्लोअर टेस्ट घेता येणार नाही. मुख्यमंत्री पदावर अजूनही उध्दव ठाकरे आहेत. त्यामुळे त्यांना मंत्री बदलण्याचा अधिकार आहे. फ्लोअर टेस्टसाठी त्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंबरोबर बोलावे लागेल. त्यांनी परवानगी दिली तरच हा निर्णय घेता येईल. राज्यपालांनी दोन वर्षे विधानसभेचे 12 सदस्य न नेमल्यामुळे राज्यपाल विरुध्द मुख्यमंत्री हा सामना जनतेला पहायला मिळाला. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर या दोघांमध्ये संगनमत होणे शक्य नाही. 174 कलमा खाली सत्र बोलावणे हे मुख्यमंत्रीच्या सल्ल्यावर अवलंबून आहे. त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना न विचारताच सत्र बोलवले तर ते घटना बाह्य ठरु शकते. मुख्यमंत्री या विषयावर कोर्टात दादा मागू शकतात.

शिवाय बंडखोर नेते एकनाथ शिंदे अजून मुंबईत परत आलेले नाहीत. ते उद्या येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय निश्चित होण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

हे सुध्दा वाचा :

ठाण्याच्या माजी महापौरांची शिवसेनेतून हकालपट्टी

बंडखोर आमदाराकडून मुंबईतील इमारत दुर्घनाग्रस्तांसाठी मोठी मदत जाहीर !

‘शिंदे साहेब सेना सोडून जाऊ नका’

रूपाली केळस्कर

Recent Posts

मनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ

मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…

3 hours ago

विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…

3 hours ago

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

7 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

7 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

8 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

9 hours ago