या आंदोलनात मुंबई व ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी रोज २०० च्या संख्येने सहभागी होतील. या आंदोलनात कृती समितीचे सर्व प्रमुख नेते सहभागी होतील. २८ फेब्रुवारी ते ७ मार्च – प्रकल्प, जिल्हा पातळीवर तीव्र निषेध निदर्शने करणार आहेत.
आझाद मैदानावरील धरणे आंदोलनाच्या वेळी शिष्टमंडळाला निमंत्रित करून सकारात्मक चर्चा न झाल्यास अंगणवाडी कर्मचारी प्रकल्प, जिल्हा परिषद, विभागीय उपायुक्त कार्यालये आदी ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहेत. ज्यामध्ये राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होतील.
९ मार्च २०२२ – आझाद मैदान मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे.
विधानसभेचे बजेट सत्र सुरू असल्याने आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात येईल. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो अंगणवाडी कर्मचारी सामील होतील. २८,२९ मार्च २०२२ – दोन तर दिवसीय देशव्यापी सार्वत्रिक संयुक्त संप पुकारण्यात येणार आहे.
देशातील कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने मोदी सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात हा संप पुकारला आहे. संयुक्त किसान मंचाने त्याला पाठिंबा दिला आहे.
भटक्या विमुक्त कंत्राटदाराचे बिल थकवले, सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात कंत्राटदाराचे उपोषण
संपामुळे झालेले नुकसान कामगारांना वसूल करावे लागणार, असा महामंडळाचा कोणताच कट नाही
Anganwadi workers to begin 3-day protest tomorrow over wages, pension
केंद्रीय बजेटमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी, महागाई शिगेला पोहोचली आहे. सर्व सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण केले जात आहे. बडे व्यावसायिक मोदींच्या छत्रछायेखाली आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचे बँकेत ठेवलेले कोट्यवधी रुपये बुडवून पळून जात आहेत. शिवाय शेतकरी आणि कामगार यांच्या विरोधात कायदे केले जात आहेत. त्यांच्या विरोधातील धोरणे राबवली जात आहेत.
याविरोधात हा संप होणार असून सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एक दिवस जिल्हा, तालुका पातळीवरील संयुक्त आंदोलनात सहभागी व्हावे व एक दिवस स्थानिक पातळीवर आंदोलन करावे, अशी हाक अंगणवाडी कृती समितीने दिली आहे. या आंदोलनात कामगार नेते एम. ए. पाटील व शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख,सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…
राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…
विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…
'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…
नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…