33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूज‘राहूल गांधींच्या पराभवाचा बदला देवेंद्र फडणवीसांना हरवून घेणार’

‘राहूल गांधींच्या पराभवाचा बदला देवेंद्र फडणवीसांना हरवून घेणार’

लय भारी न्यूज नेटवर्क

नागूपर : लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने राहूल गांधी यांचा अमेठी मतदारसंघात पराभव केला होता. हा पराभव आपल्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पराभव करूनच राहूल गांधींच्या पराभवाचा बदला घेणार आहोत, अशी गर्जना काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी केली आहे.

नागपूर दक्षिण – पश्चिम या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस व आशिष देशमुख एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवित आहेत. ‘मला सोनिया गांधींनी काही दिवसांपूर्वी बोलावून घेतले होते. त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी मला देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची सुचना केली. ती सुचना मान्य करून मी फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला’ असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी