लोकमधील सर्वच प्रवाशांना वायफायचा सहज वापर करता यावा यासाठी वायफायसाठी सक्षम यंत्रणा बसवण्यात येणार आहे. लोकमध्ये गर्दी झाल्यानंतरही वायफायची रेंज सर्व प्रवाशांना मिळावी यासाठी तयारी करण्यात येत आहे. खरे तर लोकलमध्ये प्रवाशांनी प्रवास सुरू केल्यानंतर त्यांच्या मोबाईलची रेंज निघून जाते. त्यांना मोबाईलवर बोलणेही शक्य होत नाही. असे होऊ नये यासाठी रेल्वेने आता लोकलमध्ये उच्च क्षमतेचा वायफाय राऊटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनानंतर मेट्रोच्या सर्वाधिक प्रवासी संख्येची नोंद
अश्लील व्हिडीओ कॉल करुन ब्लॅकमेल, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंची पोलिसात तक्रार
लोकलमध्ये प्रवास करताना प्रवाशांना इंटरनेट सुरळीत चालण्यास अनेक अडथळे येतात. जसे ‘घाटकोपर-विक्रोळी दरम्यान इंटरनेटला रेंज नसणे’, ‘ऑनलाइन कार्यक्रम पाहताना पारसिक बोगद्यात ‘बफरचा’ सामना करावा लागणे’ मात्र आता या त्रासापासून सुटका होणार आहे. कारण नव्या वर्षात मुंबईकरांचे लोकलमध्ये मनोरंजन होणार आहे. मध्य रेल्वेकडून स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्यात आली होती. त्याला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळात आहे. त्यातच पार्श्वभूमीवर धावत्या लोकलमध्ये प्रवाशांना वायफाय सुविधा देण्याची घोषणा रेल्वेने केली होती. मात्र, कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प नवीन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.
नवी मुंबईकर कमी दरामध्ये करू शकणार मेट्रोने ‘गारेगार’ प्रवास, जाणून घ्या तिकिट दर…
एसटी महामंडळाने गेल्या काही वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीशी करार करून राज्यभरातील 18 हजार एसटी बसेसमध्ये ‘प्री-लोडेड’ वायफाय सुविधा देण्यातली होती. त्यामुळे धावत्या एसटीत प्रवाशांना इंटरनेट सुविधा मिळत होती. एसटी महामंडळाच्या धरतीवर मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये ही ‘प्री-लोडेड’ इंटरनेट सेवा देण्याची घोषणा दोन वर्षापूर्वी मध्य रेल्वेकडून करण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणी आणि त्यानंतर कोरोनामुळे हा प्रकल्प रखडत जात होता. मात्र, रेल्वेने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता कंबर कसली असून नव्या वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे काम रेल्वेने सुरू केले आहे. एका खासगी कंपनीमार्फत मध्य रेल्वेच्या 165 लोकलमधील 3 हजार 465 डब्यात वायफाय लावण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक डब्यात एक वायफाय लावले जात असून काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…
अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…
फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…
हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…
'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…