टीम लय भारी
पुणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींवर केलेल्या वक्तव्याबाबत विचारणा केली असता उपमुख्यमंत्री अजित पवार संतापलेले दिसले. महाराष्ट्रात कोण काय म्हटलं याची उत्तर द्यायला मी मोकळा नाही, असं म्हणत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. “पुणे जिल्हा मध्यवर्धी सहकारी बँक निवडणुकीत दगाफटा होईल, याची भीती वाटत होती. ती खरी ठरली आहे. मला एका जागेबाबत शंका होतीच. त्याचा अनुभव सर्व पत्रकार घेत असता. त्यांनी काय म्हटल हे तुम्ही त्यांनाच विचारत चला.”(Ajit Pawar got angry on journalists during meeting)
ओबीसींवरती ब्राह्मण्यवादाचा इतका पगडा बसलाय. आपण श्रेष्ठ आहोत. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाहीत. हे सगळे विसरलेत. आता आरक्षणाच्या निमित्ताने का असेना पुढे येतायत. पण नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही, रस्त्यावर यावं लागेल,” असं आव्हाड म्हणाले आहेत.
लोकसभेतही खुल्या मतदानाचे पालन होते : अजित पवार
ओबीसींवर फारसा विश्वास नाही : जितेंद्र आव्हाड
मंत्री जितेंद्र आव्हाड काय म्हटले किंवा इतर मंत्री काय म्हटले हे सांगायला मी मोकळा नाही. अजित पवार म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांच्या ओबीसी आरक्षणाच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात कोण काय म्हटलं याची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही. मी माझी मतं स्पष्टपणे सांगण्यासाठी केव्हाही तयार असतो. त्याचा अनुभव सर्व पत्रकार घेत असता. त्यांनी काय म्हटल हे तुम्ही त्यांनाच विचारत चला.”माझी मत मी स्पष्ट मांडत असतो, असे अजित पवार म्हणाले.
मोदींना महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार हवे होते, पण मी नाही म्हणालो : शरद पवार
पुणे जिल्हा बँक निवडणुकीबाबत त्यांनी भाष्य केले. आमची जागा एका ठिकाणी आली नाही. आमचे कार्यकर्ते कमी पडले. मात्र, अनेक ठिकाणी मताधिक्य जास्त आहे. अनेक ठिकाणी आम्ही त्याचा विचार करु. जिल्हा बँक आली, त्यात एक जागा गेली आमचे 13 ठिकाणीं मतदान होतं. त्यात 8 ठिकाणी मागे राहिलो. बाकी सर्वच जागा चांगल्या मतांनी आल्या आहेत. निवडून आलेल्या सर्वांचे अभिनंदन, असे अजित पवार म्हणाले.