व्यापार-पैसा

१२ कोटी थकबाकी कर वसुलीकडे मनपाचा कानाडोळा

महापालिकेकडून सामान्य नाशिककरांवर कारवाईचा दंडुका उगारत मालमत्ता कर वसूल केला जात असताना दुसरीकडे मात्र शासकीय कार्यालयांकडे तब्बल बारा कोटी ४८ लाख इतकी थकबाकी असून त्याकडे सोयीस्कररित्या कानाडोळा केला जात आहे. ही कार्यालये शासकीय असल्याने त्यांच्यावर थेट कारवाई करता येत नसल्याने त्यांना विनंती पत्र पाठवले जात आहे. मात्र या अगोदरचा अनुभव पाहता शासकीय कार्यालयाकडून मनपाच्या विनंती पत्राला केराची टोपली दाखविली जाण्याची दाट शक्यता आहे.मार्च अखरेला अवघे पाच दिवस शिल्लक असून महापालिकेच्या सर्वच विभागांची वसुलीचे उदिष्ट गाठण्यासाठी घाम गाळावा लागत आहे.. मनपाच्या उत्पन्नात नगररचनानंतर सर्वाधिक वाटा हा करसंकलन विभागाचा असतो.(BMC turns a blind eye to collection of Rs 12 crore arrears tax )

गतवेळेस करसंकलन विभागाने १८८ कोटींचा मालमत्ता कर वसूल केला होता. त्यामुळे आयुक्तांनी यंदा २१० कोटी मालमत्ता कर वसुलीचे उदिष्ट दिले. त्यापैकी आजमितीला १९६ कोटी कर वसूल झाला आहे. परंतू शासकीय कार्यालयाची थकबाकी मोठी डोकेदुखी ठरत आहे. तत्कालीन कर उपायुक्त श्रीकांत पवार यांनी त्यावर मार्ग काढत राज्य सरकारच्या शासकीय कार्यालयांना सेवा कराच्या कक्षेत आणले. त्यामुळे त्यांच्याकडील करवसुलीचा मार्ग मोकळा झाला. या शासकीय कार्यालयांकडे अनेक वर्षांपासून थकबाकी असून हा आकडा साडेबारा कोटींवर पोहचला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भारत संचार निगम लिमिटेड, विक्रिकर भवन, गंगापूर रोड येथील जुने पोलिस आयुक्तालय या सारख्या मोठ्या शासकीय कार्यालयांच्या थकबाकीदारांमध्ये समावेश आहे. या कार्यालयांमधून जनतेला सेवा दिली जात असल्याने त्यांच्यावर सर्वसामान्य मालमत्ताधारकांवर केली जाणारी नळ व वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई करता येत नाही. त्यामुळे करसंकलन विभागाने या कार्यालयांनी थकबाकी अदा करावी यासाठी दरवर्षीप्रमाणे समास पत्र पाठवले आहे. दरम्यान सर्वसामान्यांनी कर बुडवल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात असताना शासकीय कार्यालयांना जणू मनपाचे जावईसारखी वागणूक दिली जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

या कार्यालयांमधून जनतेला सेवा दिली जात असल्याने त्यांच्यावर सर्वसामान्य मालमत्ताधारकांवर केली जाणारी नळ व वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई करता येत नाही. त्यामुळे करसंकलन विभागाने या कार्यालयांनी थकबाकी अदा करावी यासाठी दरवर्षीप्रमाणे समास पत्र पाठवले आहे. दरम्यान सर्वसामान्यांनी कर बुडवल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात असताना शासकीय कार्यालयांना जणू मनपाचे जावईसारखी वागणूक दिली जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

टीम लय भारी

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

4 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

4 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

4 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

5 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

5 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

8 hours ago