व्यापार-पैसा

Organic Fertilizers : ‘या’ राज्यातील महिला बनवतात जैवीक खत

झारखंडच्या लोहरदगा जिल्हयातील महिला गो-मुत्रापासून कीटकनाशक आणि खत तयार करत आहेत. हा व्यवसाय आता वाढू लागला आहे. त्यांच्या जैवीक शेतीची कल्पना शेतकरी तसेच सरकारी अधिकाऱ्यांना पटली आहे. 30 रुपये प्रति लीटर भावाने हे कीटकनाशक विकले जाते. रासायन‍िक खतांमुळे होणारे दुष्परिणाम शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहेत. त्यामुळे गोमुत्रापासून तयार केले जाणारे खत शेतकरी मोठया प्रमाणात वापर आहेत. कारण रासायन‍िक खत तसेच कीटकनाशक (Organic Fertilizers) हे किंमतीला देखील महाग असते.

लोहरदगा मधील महिला या उदयोगातून 5 ते 6 हजार रुपये कमवत आहेत. औषधीयुक्त मटका खत बनवणे तसे सोपे काम आहे आणि खर्च देखील कमी आहे. ते बनव‍िण्यात 10 लीटर गोमूत्र, एक किलो शेण, 200 ग्रॅम गुळ,  नीम, करंज आणि सिंदुवारची पानांचा उपयोग केला जातो. या मिश्रणाचा एकाच वेळी कीटकनाशक तसेच खत म्हणून उपयोग केला जातो. या कामामुळे महिलांच्या हातात पैसा येत आहेत.

घरातील सर्व कामे करतांना ते हा व्यवसाय करत आहेत. गावांमध्ये बहूतेक जणांकडे गुरे असतात. त्यामुळे त्यांना हे काम करणे सोपे झाले आहे. हे मटका खत मातीमध्ये मिसळले की, झाडे तरारून येतात. कैरो परिसरातील चार गावातील महिलांनी गट तयार केले आहेत. या महिला एकत्र येऊ हे औषधीयुक्त मटका खत बनवतात. उतका, डुमरटोली, नगडा आणि खंडा गावात अशा प्रकारचे खत  बनवले जाते.

हे सुद्धा वाचा

Six Air Bags : सहा एअर बॅगचा निर्णय 1 वर्ष पुढे ढकलला

Navratri 2022 : नवरात्रीच्या गरब्यासाठी शाळेच्या गेटला कुलूप

Nitin Gadkari : गरीब-श्रीमंतीचे अंतर कमी झाले पाह‍िजे – नितीन गडकरी

या औषधामुळे शेतात कीड लागत नाही. पिके देखील चांगले येते. पीकांची गुणवत्ता सुधारली असून, शेतकऱ्यांची मागणी वाढली आहे. लोहरदगाच्या कृषि अधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या या कार्याची दखल घेतली आहे. ते म्हणतात की, जैविक शेतीसाठी या महिला शेतकऱ्यांना प्रेरणा देत आहेत.
या खत आणि कीटकनाशकामुळे भात, मका, तुर या सारख्या पीकांना चांगला उपयोग झाला आहे.

जैव‍िक शेती करण्यावर कृषी विभाग देखील भर देत आहे. भविष्यात अशा प्रकारची शेती करणे जरूरीचे आहे. या खतामुळे मातीचे चांगल्या प्रकारे पोषण होते. तसेच प्रदूषण देखील कमी होते. तसेच अनेक प्रकारचे आजार देखील कमी होतात. अशा प्रकारे प‍िकवण्यात आलेले अन्न हे आयोग्यासाठी उत्तम आहे.

रूपाली केळस्कर

Recent Posts

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

2 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

2 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

4 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

5 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

18 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

20 hours ago