येत्या वर्षभरात भारतीय रेल्वे देशात अनेक नवीन वंदे भारत ट्रेन चालवण्याची घोषणा करू शकते. यासोबतच रेल्वे सध्याच्या पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्याचा आग्रह धरणार आहे. त्यासाठी रेल्वेला मोठा निधी लागणार आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने अर्थसंकल्पात स्वत:साठी अधिक निधीची मागणी केली आहे. आता त्यामुळे रेल्वे मंत्रालयाच्या या मागणीवर काय निर्णय होतो हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरत आहे. त्यासोबतंच यावर्षीच्या अर्थसंकल्पात आणखी कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत याबाबत आपण जाणून घेऊया
रेल्वेने 30 टक्के अधिक निधी मागितला
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्यासाठी दोन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. विविध मंत्रालये आणि क्षेत्रांनी त्यांच्या मागण्यांची यादी अर्थ मंत्रालयाला सादर केली आहे. रेल्वे मंत्रालयानेही आपल्या मागण्यांचा एक भाग अर्थ मंत्रालयाला सुपूर्द केला आहे. आगामी अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयाने 2023-24 मध्ये 30 टक्के अधिक बजेटची मागणी केली आहे. या निधीतून रेल्वे अनेक नवीन वंदे भारत गाड्या चालवण्याची घोषणा करणार आहे. नवीन रेल्वे ट्रॅक टाकण्यासोबतच पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी खर्च केला जाईल.
हे सुद्धा वाचा
सर्वात मोठी बातमी : संजय राऊत म्हणतात, भाजप आणि आपचे सेटिंग!
गुजरात : भाजप मोडणार सर्वाधिक जागांचा विक्रम, तर काँग्रेसचाही सर्वात कमी जागांचा विक्रम होणार!
हिमाचल प्रदेशात काँग्रेसने ओलांडला बहुमताचा टप्पा; भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका!
वाटप केलेल्या निधीपैकी 93% निधी खर्च झाला आहे
2022-23 मध्ये, रेल्वे मंत्रालयाला भांडवली खर्चासाठी 1.37 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, त्याशिवाय महसूल खर्चासाठी 3267 कोटी रुपये, जे मागील वर्षाच्या तुलनेत 17 टक्के जास्त होते. 31 ऑक्टोबरपर्यंत रेल्वेने तरतूद केलेल्या बजेटपैकी 93 टक्के खर्च केला आहे. ज्यामध्ये भांडवली खर्चावर 1.02 लाख कोटी रुपये आणि महसुली खर्चावर 25,399 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
प्रवासी आणि मालवाहतुकीतून मिळणाऱ्या कमाईत 76 टक्क्यांनी वाढ झाली आहे
येत्या महिनाभरात रेल्वेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असून, त्यामुळे रेल्वेच्या बजेटमध्ये मोठी वाढ होणार असल्याचे मानले जात आहे. प्रवासी आणि मालवाहतुकीमुळे रेल्वेचे उत्पन्न वाढले आहे. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत रेल्वेच्या उत्पन्नात 76 टक्के वाढ झाली आहे. ज्यामध्ये मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नात 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुढील वर्षीही हाच कल कायम राहील, अशी आशा सरकारला आहे. मालमत्तेच्या कमाईवरही रेल्वेचे लक्ष असेल.
चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…
हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…
नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…
एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…