31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयभाजपधार्जिण्या राज्यपालांच्या अंगणात काँग्रेसचे आंदोलन

भाजपधार्जिण्या राज्यपालांच्या अंगणात काँग्रेसचे आंदोलन

टीम लय भारी

मुंबई :- पेगॅसस सॉफ्टवेअर स्पायवेअरच्या मदतीने भारतातील काही लोकांचे फोन हॅक केल्याचा मुद्दा समोर आला आहे. पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फोन हॅक करून हेरगिरी केली जात आहे. या प्रकरणातबाबत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतीयांची केंद्र सरकारनेच जासूसी केल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे (Congress is accusing the central government of spying on Indians).

राजभवनसमोर केंद्रातील मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत हेरगिरीचा निषेध केला. तसेच भाजपधार्जिण्या राज्यपालांच्या अंगणात काँग्रेसने आज जोरदार आंदोलन केले आहे.

Video : पॅगेससमधून मोबाईल हॅक होतो, मग ईव्हीएमही का होऊ शकणार नाही?

‘अजितदादा दोन हाणा, पण आपला म्हणा’; कार्यकर्त्याचा जाहिरातीमधून माफीनामा

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नेहमी भाजपच्या बाजूने आपली भूमिका निभावत असतात. कोश्यारी हे राज्याचे राज्यपाल आहेत का भाजप पक्षाचे राज्यपाल आहेत, असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो. या प्रकरणाबाबत अजूनही कोणतीही योग्य कारवाई झाली नाही आहे. पेगॅससप्रकरणी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे (Balasaheb Thorat, Ashok Chavan and Nana Patole have taken an aggressive stance in the Pegasus case).

देशातील राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हॅक करून हेरगिरी केली जात आहे. काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील सहकारी, इतर विरोधी पक्षांचे नेते यांचीही हेरगिरी करण्यात आलेली आहे. संविधानाने दिलेल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकारावरचा हा हल्ला तर आहेच परंतु लोकशाही मुल्याच्या मुळावरच घाव घातलेला आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असून काँग्रेसने आज राज्यपालांना भेटून निवेदन दिले. या निवेदनात हेरगिरी प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

Congress accusing central government spying on Indian
राज्यपाल आणि काँग्रेसचे मोठे नेते

मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली व विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस नेत्यांनी आज राजभवनसमोर केंद्रातील मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत हेरगिरीचा निषेध केला. प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, फोन हॅक करुन त्यांचे संभाषण ऐकणे हा लोकांच्या खाजगी स्वातंत्र्यावर घातलेला घाला आहे.

केंद्रातील मोदी सरकारने लोकशाहीचा खून केला असून लोकशाही वाचवली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. या फोन हॅकिंगचा वापर करूनच केंद्र सरकारने कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसचे सरकार व मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकारही पाडले. 2016-17 मध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारच्यावेळीही माझा व इतर काही व्यक्तींचे फोन टॅप करण्यात आले होते. हा मुद्दा विधानसभेतही उपस्थित करण्यात आला होता (The issue was also raised in the Assembly).

Video : सातारा-पाटण तालुक्यात अनेक पूल पाण्याखाली

Congress accuses BJP-led dispensation of misusing Pegasus to being down elected Karnataka government

पेगॅससचा वापर करून पत्रकार व विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पाळत

विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, पेगॅससचा वापर करून पत्रकार व विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पाळत ठेवली जात आहे. दै. भास्कर आणि भारत समाचार वरील आयकर विभागाच्या धाडी हा स्वतंत्र पत्रकारितेचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आणि देशाच्या लोकशाहीवरील हल्ला आहे. यंत्रणांचा गैरवापर करून मोदी सरकार देशात हुकूमशाही आणू पाहात आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, देशातील स्थिती अत्यंत वाईट आहे. न्यायपालिका, राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे यांची हेरगिरी केली जात आहे. पेगॅसस सॉफ्टवेअर हे फक्त सरकारलाच विकले जाते असे असताना सरकारमधील कोण या माध्यमातून पाळत ठेवत होते. हे अत्यंत गंभीर असून याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी काँग्रेसची मागणी आहे (The Congress has demanded a judicial inquiry into the matter).

या शिष्टमंडळात उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, पशु संवर्धनमंत्री सुनिल केदार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसिम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, उपाध्यक्ष संजय राठोड, माजी मंत्री बाबा सिद्दीकी, आमदार अमर राजूरकर, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस राजन भोसले, प्रकाश सोनावणे, प्रमोद मोरे, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, देवानंद पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी