एज्युकेशन

दहावीत उत्तीर्ण होऊनही विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील दहावीचा निकाल यंदा दरवर्षीपेक्षा थोडा लवकर जाहीर करण्यात आलेला आहे. पण एक महिना होऊन सुद्धा दहावीचे विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश कधी करण्यात येणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विचारण्यात येत आहे.

दरम्यान, राज्य मंडळाचा दहावीचा निकाल एक महिना आधी जाहीर झाला असला तरी, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचा निकाल अजूनही जाहीर झालेला नाही. त्यामुळेच अकरावीचे प्रवेश सुरु करण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु सात-आठ टक्के विद्यार्थ्यांसाठी लाखो विद्यार्थ्यांचे प्रवेश अजूनही का सुरु करण्यात आलेले नाही? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात दहावीच्या राज्य मंडळाच्या परीक्षा उशिरा घेण्यात आल्या. पण तरीही दरवर्षीपेक्षा यंदा दहावीचा निकाल लवकर लावण्यात आला. त्यामुळे यावर्षी मुलांचे अकरावीमध्ये प्रवेश लवकर करण्यात येतील, असेच विद्यार्थ्यांच्या पालकांना वाटले होते. पण सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे दहावीचे निकाल जाहीर न झाल्याने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश देखील लांबणीवर टाकण्यात आले आहेत.

दरवर्षी राज्य मंडळाचे दहावीचे निकाल हे उशीरा जाहीर करण्यात येतात. तर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे निकाल लवकर जाहीर करण्यात येतात. पण यंदा या दोन्ही बोर्डांच्या निकालाला जुलै महिन्याचा अखेर उजाडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :

अंबरनाथ नगर परिषदेतही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसणार धक्का

काय सांगता…? 74 वर्षीय तरुणाचा चक्क मोटारसायकलवरून सांगली ते अमरनाथ प्रवास

खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना दडपण्याचे षडयंत्र? मागास वर्गीय मुलांची मदतीसाठी हाक

पूनम खडताळे

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

2 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

2 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

2 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

2 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

2 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

6 hours ago