Featured

Thackeray vs Shinde : ठाकरे शिंदे गटाचे भवितव्य उद्या

राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे गट हा सत्ता संघर्षाचा पेच आज संपेल असे सर्वांना वाटले होते. मात्र आजही सर्वांचा अपेक्षाभंग झाला. उद्या सकाळी १०.३० वाजता या विषयावर सुनावणी होणार आहे. उद्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा देशात निर्माण झालेला सर्वांत मोठा सत्तापेच आहे. जगातल्या कोणत्याही देशात नाही असे सरकार आपल्याकडे आहे. केवळ दोन जणांचे मंत्रीमंडळ राज्य कारभार करत आहे. त्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याला तब्बल एक महिन्यानंतर देखील मंत्रीमंडळ नाही.

त्यामुळे राज्यात अनेक समस्यांना तोंड फुटले आहे. याचा राज्यातील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये शिंदेंचा गट मूळ शिवसेनेवर दावा करु शकत नाही असा युक्तीवाद शिवसेनेच्या वतीने कप‍िल सिब्बल यांनी केला. शिवाय शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर फूट मान्य केली आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदयानुसार विल‍िनीकरण हाच एक मार्ग आहे. शिंदे गट जो दावा करत आहे. आम्ही म्हणजे शिवसेना आहोत. तर त्यांना नवीन पक्ष काढावा लागू शकतो. त्यांना भाजपमध्ये विलीन व्हावे लागू शकते. जर ते भाजपमध्ये विलीन झाले तर मग आम्ही बाळासाहेबांच्या विचारधारेवर चालतो. हा त्यांचा दावा देखील फोल ठरेल.

हे सुद्धा वाचा 

Deepak Kesarkar : संत दीपक केसरकर ठाणे हृदयसम्राट एकनाथ शिंदेंना भेटले

Phulandevi : सामान्य महिला असलेल्या फुलनदेवीवर डाकू होण्याची वेळ का आली ?

Rohit Sharma : विराट कोहलीने गमविले, ते रोहित शर्मा परत मिळवणार

कदाचित शिंदे गटाला नवीन पक्ष तयार करावा लागू शकतो. शिंदे गटाला आपण मूळ पक्ष असल्याचे निवडणूक आयोगा समोर सिध्द करावं लागेल. उदया १६ आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न देखील मार्गी लागू शकतो. राज्यपालांची भूमिका काय असायला हवी यावर कोर्टात उदया युक्तीवाद होण्याची शक्यता आहे. जा एका पक्षाचे सरकार केंद्रात असेल आणि दुसऱ्या पक्षाचे सरकार राज्यात असेल तर राज्यापालांच्या अधिकारांचा गैरवापर होऊ शकतो. शिंदे गट हा स्वतंत्र राहिला आहे. हा सत्तापेचाच तिढा अजून काही दिवस राहू शकतो. कारण हा घटनात्मक पेच प्रसंग आहे. त्यामुळे कदाचित ५ किंवा त्याहून अधिक न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे हे प्रकरण जाईल त्यानंतरच न्याय निवाडा होण्याची शक्यता आहे.

त्याला किती काळ लागेल. हे यावेळी कोणीही ठाम पणे सांगू शकत नाही. १ आठवडयाच्या आता असे घटनापीठ तयार झाले, तर याचा लवकर उलगडा होऊ शकतो. या प्रसंगामुळे लोकशाहिचे नुकसान होत आहे. शिंदे गटाला पक्ष सोडायचा असेल तर राजीनामा दयावा लागेल.

रूपाली केळस्कर

Recent Posts

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

31 mins ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

53 mins ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

1 hour ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

2 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

3 hours ago

मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…

10 hours ago