टीम लय भारी
राज्यातील कोरोनाची गंभीर स्थिती, पुढ्यात ठाकलेला तिसऱ्या लाटेचा धोका, नुकतीच झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे उदभवलेली पूरपरिस्थिती अशा काळात मुख्यमंत्र्यांनी कायद्याला धरून चालावे अशा आशयाचे पत्र चंद्रकांत पाटील यांनी लिहिले आहे.
पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याकडून कंत्राटदारांची छळवणूक!
अजित पवारांच्या पुतणीचे आज लग्न, विवाहस्थळ बंगळुरू !
पत्रात ते पुढे म्हणतात, महाराष्ट्रावर एकामागून एक कोसळणाऱ्या संकटांचा विचार करून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वाढीव बदल्या मुख्यमंत्र्यांनी टाळाव्यात. मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या वाढवून पंचवीस टक्के इतक्या केल्या आहेत.
बदल्यांची मर्यादा वाढवून 25% केल्यानंतर विशेष कारणास्तव 10% बदल्यांनाही परवानगी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या कारणास्तव 2005 मध्ये आंदोलन केले होते. त्यानंतर 30 टक्क्यांवर बदल्या होऊ नयेत असा कायदा झाला होता. मुख्यमंत्र्यांनी 35% बदल्या करण्यास परवानगी दिल्यामुळे कायद्याचे उल्लंघन होत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मोठ्या प्रमाणात बदल्या होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी बदल्या करण्याचा कोटा वाढवल्यामुळे अधिकाऱ्यांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले आहे व बदल्या करण्याचा बाजार मांडला आहे. याची जबाबदारी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांचीच आहे.
‘ओठांवर वेदना होतात म्हणून ‘देवेंद्रां’चे नाव हातावर गोंदले’ – नरेंद्र पाटील
Maharashtra Rains LIVE: CM Uddhav takes stock of flood-hit Chiplun; 150 NDRF teams deployed
राज्यातील संकटे अजून पूर्णपणे निवळली नसताना बदल्या झाल्यास त्याचे त्याचे पडसाद नागरिकांच्या जीवनावर होऊ शकतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व पुरग्रस्तांसाठी ज्या योजना राबवण्यात येत आहेत. त्यावर या होणाऱ्या बदल्यांचा मोठा परिणाम होऊ शकतो. कोरोना परिस्थितीमुळे बदल्या टाळाव्यात असे धोरण सरकारने गेल्या वर्षी ठरविले होते. या वर्षीही ते लागू करावे अशीही मागणी चंद्रकांत पाटील यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.
चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…
लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…
लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…
साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…
अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…
नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…