विजय वडेट्टीवारांचा भाजपला खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई :- बीड जिल्ह्यातुन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह पदाधिकारी आणि मुंडे समर्थक राजीनामे घेऊन मुंबईला आले. नाराज असलेल्या सर्व मुंडे समर्थक आणि पदाधिकाऱ्यांशी आज भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी संवाद साधला. यावेळी कौरव, पांडवाच्या युद्धाचा उल्लेख करत पंकजा यांनी पक्षांतर्गत राजकारणावर बोट ठेवले. या वक्तव्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे (Congress leader Vijay Vadettiwar slammed the BJP).

पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, कौरव कोण, पांडव कोण हे त्यांचे त्यांनीच ठरवावे. त्यांची सेना, त्यांचेच कौरव, त्यांचेच पांडव, अंगणही त्यांचेच आणि महाभारतही तिकडचेच, ते त्यांनाच लखलाभ’, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांच्यासह भाजप नेत्यांना टोला लगावला आहे.

तुमच्या राजीनाम्यावर मला स्वार व्हायचे आहे, पंकजा मुडेंचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

पंकजा मुंडे घेणार नाराज समर्थक आणि पदाधिकाऱ्यांची भेट

पंकजा मुंडेंनी साधला समर्थकांशी संवाद

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार यादीतुन बीडच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांचे नाव डावलण्यात आले. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह पदाधिकारी आणि मुंडे समर्थक राजीनामे घेऊन मुंबईला आले. आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला (BJP leader Pankaja Munde interacted with the office bearers).

विजय वडेट्टीवार

जामखेडमध्ये भाजपच्या 40 पदाधिकाऱ्यांनी दिले तडकाफडकी राजीनामे

Mumbai: Vijay Wadettiwar rues not getting revenue dept; Thorat asks him to be patient

पंकजा मुंडेंनी राजीनामे फेटाळले

पंकजा मुंडेंच्या वरळीतील निवासस्थानी मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना समजावत म्हणाल्या राजीनामे देऊ नका, असा आदेश दिला गेला आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. मी एवढचे सांगेल की तुमचे राजीनामे मी स्वीकारणार नाही. असे म्हणत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे राजीनामे फेटाळले आहेत.

पंकजा मुंडेंनी काढली समर्थकांची समजूत

धर्मयुद्धात पाच पांडव जिंकले. त्यांनी फक्त सात गावं मागितली होती. पण सुईच्या टोकाएवढीही जागा देणार नसल्याचे कौरव म्हणाले. त्यानंतरही पांडव जिंकले. या धर्मयुद्धात पांडव का जिंकले? कारण त्यांच्याकडे कृष्णाचे सारथ्य होते. त्यांच्याविरोधात जे लढत होते, त्यांच्या मनातही पांडवांच्या मनात प्रेम होते. म्हणून पांडव जिंकले. काळ कधीच कुणासाठी थांबत नाही. मी दु:खी नाही. मला काही मिळाले नाही या चिल्लर गोष्टींवर मी जात नाही. मीही पांडव आहे. आम्हीही योद्धे आहोत. मीही धर्म युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे. जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे. असे म्हणत त्यांनी सर्व मुंडे समर्थक आणि पदाधिकाऱ्यांची समजूत काढली.

Rasika Jadhav

Share
Published by
Rasika Jadhav

Recent Posts

नाशिक शरणपूर येथे ज्येष्ठ नागरिकाला धमकावत सायबर चोरट्यांनी उकळले सात लाख

मोबाइल क्रमांकावरुन सुरु झालेल्या बँक खात्यावर सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार  झाल्याचे धमकावून व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी…

24 mins ago

पंकजा मुंडेंची लढाई जातीयवादाच्या पेचात

बीडची निवडणुक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर कमी आणि जातियतेला धरून अधिक अशीच आता होताना दिसतेय. आरक्षण…

51 mins ago

४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा

उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde)…

52 mins ago

नाशिक इंदिरानगर येथे वॉशिंग मशिनमध्ये ठेवलेले दागिन्यांची चोरी

इंदिरानगरमध्ये (Indiranagar) चोरट्याने चक्क वॉशिंग मशिनमध्ये (washing machine) लपवून ठेवलेले सुमारे दीड लाखांचे दागिने (Jewellery…

1 hour ago

३० मेपर्यंत खोदलेले रस्ते दुरुस्ती न झाल्यास महापालिका नेमकी कोणावर कारवाई करणार?

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून (MNGL) घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्याच्या प्रकल्पासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले (roads…

2 hours ago

दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात

राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक (State Director of Archaeology) संशयित डॉ. तेजस मदन गर्गे…

2 hours ago