महाराष्ट्र

आनंद दिघे, एकनाथ शिंदे नंतर ठाण्याची धूरा कोणाकडे ?

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदेंची कामाची शैली ही आनंद दिघेंच्या कार्याशी सुसंगत आहे. पक्ष बांधणी, निवडणुकीची रणनीती तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ठाण्यात शिवसेना उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. राजकारणात ते खालपासून वर गेले. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा गड मानला जातो. आनंद दिघे नंतर हा गड एकनाथ शिंदेंनी उत्तम प्रकारे सांभाळला. मात्र आता एकनाथ शिंदेनंतर ठाण्याची धूरा कोणाकडे जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

विधान परिषदेचा निकाल हे राज्यातील राजकारणाचे परिवर्तन असल्याचे विधान काल देवेंद्र फडणवीसांनी केले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सोडा, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप सोबत यावे. काॅंग्रेस, रा.काॅंग्रेसची साथ सोडावी. त्यांच्यामुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. एकनाथ शिंदेच्या मनात ही खदखद गेल्या अनेक दिवसांपासून होती. अनेकदा एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या.

शिवसेना पक्ष बांधणीमध्ये एकनाथ शिंदेचा मोठा मोलाचा वाटा होता. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना डावलण्यात आले होते. गटनेतेपद असून देखील त्यांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले जात होते. मुख्यमंत्री पदासाठी उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचे नाव सुचवले होते. या प्रस्तावाला सुभाष देसाई आणि संजय राऊत यांनी विरोध केला. त्यामुळे एकनाथ शिंदे दुखावले गेले. विधी मंडळातील सर्वाधिक आमदारांचे पाठबळ एकनाथ शिंदे यांना नेहमीच असायचे. तसेच शिवसेनेमधील ते एक लोकप्रिय नेते होते. एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान होईल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्या पेक्षाही मोठे नुकसान शिंदेंच्या जाण्याने होवू शकते. त्यामुळे एकनाथ शिंदे बाहेर पडू नये हीच इच्छा शिवसैनिकांची होती. अनेक शिवसैनिकांनी माध्यमांसमोर बोलतांना आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेनेच्या पहिल्या पाच नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. शिवसेनेत एक विस्कळीतपणा आला होता.

1991 मध्ये नागपूर अधिवेशनाच्यावेळी छगन भुजबळांनी शिवसेना सोडली. त्यानंतर नारायण राणेंनी 2005 साली शिवसेनेला रामराम केला. तर ठाकरे कुटुंबातील सदस्य असलेल्या राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि मनसे हा नवा पक्ष तयार केला. त्यामुळे शिवसेनेला हे पाचवे मोठे खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा :

शिवसैनिकांनी दिला गद्दारांना शाप

‘त्या’ आमदारांच्या जीवाला धोका

एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद हवे होते

भाजपचे नेते ‘बांधणी‘ करत होते; तेव्हा महाविकास आघाडीचे नेते ‘झोपा‘ काढत होते !आनंद दिघे नंतर हा गड एकनाथ शिंदेंनी उत्तम प्रकारे सांभाळला.

पूनम खडताळे

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

7 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

7 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

8 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

8 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

14 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

15 hours ago