युवासेनाप्रमुख आणि वरळी विधान सभा क्षेत्राचे आमदार आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यात भेट झाली आहे. या दोन्ही राजकीय वारसा असलेल्या आणि नव्या पिढीच्या नेत्यांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली. यावर शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या की, ठाकरे गटाची परंपरा आदित्य ठाकरे पुढे चालवत आहेत. तसेच लालू प्रसाद यादव यांच्या पक्षातील तेजस्वी यादव हे त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत. हे दोन तरुण नेतृत्व देशाच्या संविधान वाचवा तसेच तरुणांचे प्रश्न, बेरोजगारीच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या अशा अनेक समस्येवर बोलत आहेत. असे तरुण नेतृत्व एकत्र आले कि देशाला एक चांगली दिशा मिळेल. एक सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल.
दरम्यान त्यांनी भारतीय जनता पक्ष यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यामध्ये त्यांनी भाजप वर निशाणा साधत तुम्ही मराठी दांडिया करता तसेच छट पूजा करता तुम्ही उत्तर भारतीय दिवस साजरे करता असे बोल्त त्यांच्यावर टीकास्त्र सोडले ‘आम्ही केलं तर पाप आणि तुम्ही केलं तर पुण्य हा भारतीय जनता पक्षाचा नेहमीचा प्रकार आहे.
नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…
गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना माेक्का (MCOCA) लावण्यात आला…
भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…
याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…
पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…