कोकण

Konkan : अबब ! कोकणच्या रस्त्यांची भयानक चाळण !

गौरी गणपतीचा सण जवळ आला असून, कोकणातले चाकरमाने आपल्या गावाकडे सणसाठी जायची तयारी करत आहेत. कोकणी माणूस आणि गणेशोत्सव हे एक समीकरण आहे. काहीही झाले तरी कोकणातला माणूस हा गणपतीसाठी गावाला आपल्या घरी, नातेवाईकांकडे जातो. ते त्यांचे दरवर्षीचे ठरलेले असते. त्याच प्रमाणे दरवर्षी कोकणात जातांना याच कोकणी माणसांना खडतर प्रवास करावा लागतो. कारण मुंबई गोवा महामार्गाची दरवर्षी पावसाळयात चाळण झालेली असते. या वरुन एका युजर्सने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. ती चांगलीच व्हायरल झाली आहे.

रवींद्र मालुसरे असे या कोकणातल्या माणसाचे नाव आहे. मालुसरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, ‘गणपतीला कोकणात जाणार… कोकणी माणसाचा शारीरिक व‍िमा कोण काढणार ?’ अशी पोस्ट टाकून त्यांनी कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा‍ व्ह‍िडीओ शेअर केला आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde :‘एकनाथ शिंदेनी तंबाखूला चुना लावला’

Farmers protest : किमान आधारभूत किमतीसाठी पुन्हा एकदा शेतकरी देणार सरकारला टक्कर

Irrigation scam : काय आहे सिंचन घोटाळा ?

‘नेमिची येतो पावसाळा’ या म्हणीप्रमाणे पावसाळा हा दरवर्षी न चुकता येतो. मुंबईसह कोकणात धुवाधार पाऊस कोसळतो. त्यामुळे दरवर्षी कोकणात जाणारे रस्ते खडडयानी भरलेले असतात. आपल्या राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली. अनेक नेते आले आणि गेले. परंतु ही समस्या कायम राहिली. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदु्र्ग, पालघर हे जिल्हे कोकणात मोडतात. इतक्या ठिकाणच्या माणसांना प्रवासात मोठी कसरत करावी लागते. कोकणातील अनेक नेत सत्ताधरी आहेत. तसेच विरोधात आहेत. राज्य सरकारमध्ये आहेत.

तसेच केंद्र सरकारमध्ये आहेत. मात्र यापैकी कोणीही कोकणातील ही समस्या सोडवू शकलेला नाही. अनेक जण कोकणात जाण्यासाठी विशेष गाडयांची सोय करतात. तर कोणी त्रास होऊ नये म्हणून रेल्वेने जातात. मात्र प्रत्येकाला रेल्वेने प्रवास करणे शक्य नाही. रेल्वेने गेले तरी नंतर पुढचा प्रवास हा रस्त्यांनी करावाच लागतो.

निवडणुकीत हीच नेते मंडळी मते मागण्यासाठी दारोदारी फ‍िरतात, निवडणूक झाली की त्यांना दिलेल्या वचनांचा विसर पडतो. कोकणातील माणसं साधी भोळी आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत असल्याने त्यांचा फायदा घेतला जातो. मुंबई नागपूर महामार्ग मागून सुरु झाला तो की सुंदर बनला आहे. मात्र मुंबई गोवा महामार्गाचे काम 12 वर्षांपासून सुरु आहे.

रूपाली केळस्कर

Recent Posts

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

3 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

4 hours ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

5 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

6 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

6 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

7 hours ago