शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे कायमच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. महिला पत्रकाराने टिकली लावली नाही म्हणून वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी एका महिला पत्रकाराला ‘आधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलतो’ असं अजब वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. भिडेंच्या या वक्तव्यावरून सर्वच स्तरातून त्यांच्यावर तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी संभाजी भिडेंना महिला आयोगाने नोटीस पाठवत सविस्तर उत्तर मागवले होते. मात्र आता भिडेंनी महिला आयोगाला उत्तर देण्यासाठी 10 दिवसाचा वाढीव अवधी मागितला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
राज्य महिला आयोगाच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, महिला पत्रकाराचा टिकली लावली नाही म्हणून अवमान करणाऱ्या संभाजी भिडेंनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा अशी नोटीस राज्य महिला आयोगाकडून बजावण्यात आली होती. आयोगाने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी मला 10 दिवसांचा अवधी मिळावा असा विनंती अर्ज संभाजी भिडे यांनी कार्यालयाकडे केला आहे. आता भिडे नेमकं आपल्या वक्तव्याबाबत महिला आयोगाला काय उत्तर देतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
हे सुद्धा वाचा
Devendra Fadanvis : शेती पंपांच्या वीज जोडण्या कापू नका!; फडणवीसांच्या आदेशामुळे शेतकऱ्यांना दिलासा
नेमके प्रकरण काय?
संभाजी भिडे हे 2 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आले होते. भेट झाल्यावर पत्रकारांनी संभाजी भिडे यांना घेरले. यामध्ये महिला पत्रकारांचाही समावेश होता. यानंतर भिडेंना महिला पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता, तुझ्या कपाळाला टिकली नाही, त्यामुळे मी प्रतिक्रिया देणार नाही. एवढेच नाही तर आपली भारतमाता विधवा नाही. प्रत्येक स्त्री ही भारतमातेसमान असते, तू कुंकू लाव. मग मी तुझ्याशी बोलेन, दरम्यान त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…
दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत (wealth)…
४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…
लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…
अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…