छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा धोरणात्मक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने हाती घेतलाय की काय असा सवाल सध्या पडत आहे. याच कारण ठरतंय ते भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून होणारी वादग्रस्त विधाने. सर्वात आधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल बादग्रस्त विधानं केलं होतं. त्यानंतर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि भाजप आमदार आणि सध्याचे पर्यावरण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील वादरग्रस्त विधाने केली होती. या सगळ्यांत भर म्हणून आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी महाराजांबाबत आणखी एक वादग्रस्त विधान केल्याचं समोर आलं आहे.
शिंदेगटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदेच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याशी केली आहे. त्यामुळे छत्रपतीच्या अपमानाच्या मुद्द्यावरून शिंदे-भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यााधीही भाजपाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.
हे सुद्धा वाचा
भारताच्या पाहुणीबाबत ‘हे’ घडणं संपाजनक; सुप्रिया सुळेंची कठोर कारवाईची मागणी
अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना बोचरा सवाल !
अल्पवयीन मुलीवर 3 वर्षे बलात्कार करणाऱ्या बापाला 20 वर्षांची शिक्षा
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे वादग्रस्त विधान
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत असे वादग्रस्त विधान केले होते. तेव्हापासून या सर्व वादाला सुरुवात झाली आहे.
मंगलप्रभात लोढा यांचे वादग्रस्त विधान
औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कुणीतरी डांबून ठेवलं होतं पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले होते.
सुधांशू त्रिवेदी यांचे विधान काय होते?
राहुल गांधी म्हणाले की वीर सावरकर यांनी माफी मागितली आहे. मात्र, माफीनाम्यावर बोलायचं झालं तर, त्याकाळी सुटका होण्यासाठी अनेक जण माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील औरंगाजेबाला 5 वेळ पत्र लिहून माफी मागितली. असं वादग्रस्त विधान सुधांशू त्रिवेदी यांनी केलं होतं.
दरम्यान, आता सरकारमधील आणखी एक आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. समाजातील सर्व स्तरावरून आता थेट महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या शिंदे – फडणवीस सरकारलाच धारेवर धरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…
दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत (wealth)…
४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…
लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…
अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…