महाराष्ट्र

Bharat Jodo Yatra in Maharashtra : शरद पवार भारत जोडो यात्रेला राहणार गैरहजर

‘नफरत छोडो, भारत जोडो’ असा नारा देत सुरु झालेली राहुल गांधींच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रासोमवारी रात्री नांदेडमध्ये दाखल झाली. महाराष्ट्रात पाऊल ठेवताच राहुल गांधी यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी धगधगती मशाल हाती घेऊन भारत जोडो पद यात्रा सुरु केली. पुढील 18 दिवस राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो पदयात्रा 328 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच अनेक संघटना सहभागी होणार आहेत. दरम्यान, या भारत जोडो यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबतची माहिती दिली. शरद पवार यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आठ दिवस शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची तब्येत बरी नसल्याकारणाने शरद पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु शरद पवार हे तब्येतीच्या कारणास्तव भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नसले तरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे आणि रोहित पवार हे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. पुढील 18 दिवसांत राष्ट्रवादीचे हे नेते वेगवेगळ्या ठिकाणाहून या यात्रेत सहभागी होतील

भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे तसेच इतर नेते सहभागी झाले. तर बुधवारी (ता. 9 ऑक्टोबर) भाई जगताप, अतुल लोंढे, सचिन सावंत, डॉ. राजू वाघमारे यांच्यासह इतर नेते सहभागी झालेले पाहायला मिळाले.

हे सुद्धा वाचा

Shetkari Samvad Yatra : शहाजी बापूंच्या मतदार संघात आदित्य ठाकरेंना तुफान प्रतिसाद

Deepali Sayyad : ‘उद्धवां’ची साथ सोडत दीपाली सय्यद ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’

Justice DY Chandrachud : सुप्रीम कोर्टाची कमान मराठी माणसाच्या हातात

भारत जोडो यात्रेमध्ये अनेक संघटना सहभागी झाल्या आहेत. यात्रेमध्ये सहभागी झालेल्या लोकांमध्ये सुद्धा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. यावेळी राहुल गांधी हे यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांशी संवाद सुद्धा साधत आहेत. बुधवारी राहुल गांधी यांनी नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. भारत जोडो यात्रा सुरु झाल्यापासून या यात्रेबाबत अनेकांकडून टीका करण्यात आली.

पूनम खडताळे

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

11 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

12 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

12 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

12 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

13 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

15 hours ago