पश्चिम महाराष्ट्र

अष्टविनायक दर्शन : पाचवा गणपती भक्तांचे विघ्न हरण करणारा ओझरचा ‘विघ्नेश्वर’

गणपती हे विद्येचे दैवत आहे. तसेच ते भक्तांचे संकट हरण करून त्यांना सुख देते. त्यामुळेच गणपतीला ‘विघ्नेश्वर’ हे नाव आहे. भक्तांची संकटे दूर करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारे गणपती बाप्पा सर्वांना वंदनीय आहेत. अशा विघ्न हरण करणाऱ्या गणपतींची आठ मंदिरे अष्टविनायक या नावाने प्रसिद्ध आहेत. अष्टविनायकांपैकी पाचवा गणपती म्हणजे ओझरचा ‘विघ्नेश्वर’ होय. हे स्थान कुकडी नदीच्या क‍िनाऱ्यावर वसलेले आहे. हा गणपती अष्टविनायकांपैकी सर्वांत श्रीमंती गणपती आहे. या गणपतीची मूर्ती लांब रुंद आहे. गणपतीच्या डोळयात माणिक रत्न असून, कपाळावर हिरा आहे. या गणपतीच्या चेहऱ्यावर तेज असून, मुर्ती प्रसन्न चित्त आहे. हा गणपती सर्व विघ्नांचे हरण करतो, म्हणून त्याला ‘विघ्नेश्वर’ गणपती या नावाने ओळखतात.

ही मूर्ती स्वयंभू आहे. या मंदिराच्या चारही बाजूंनी तटबंदी असून, मध्यभागी गणपतीचे मंद‍िर आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी १७८५ मध्ये या मंद‍िराचा जीणोद्धार केला. या मंदिरावर सोनेरी कळस चढवला. या ठिकाणाहून जवळच खोडदा येथे आशिया खंडातील सर्वांत मोठी इलेक्ट्रीक दुर्बिण आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला देखील येथून जवळ आहे.

हे सुद्धा वाचा

Ashtavinayaka Darshan : अष्टविनायक दर्शन- त‍िसरा गणपती भीमेच्या तिरावरचा ‘सिद्धटेकचा’ सिद्धिविनायक

Ashtavinayak Darshan : दुसरा गणपती – भक्तांची चिंताहरण करणारा थेऊरचा ‘चिंतामणी’

Ashtavinayak Darshan : अष्टविनायक दर्शन- चौथा गणपती’ रांजणगाव’चा महागणपती

राजा अभ‍िनंदनने मोठा यज्ञ केला होता. त्याला त्रैलोकावर राज्य मिळवायचे होते. त्यामुळे देवांचा राजा इंद्र यांना भीती वाटू लागली. इंद्रदेवाने यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली. तो राक्षस उन्‍मत्त झाला. त्याने सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरूवात केली. तो ऋषीमुनींना त्रास देऊ लागला. त्यामुळे त्याला मारण्यासाठी ऋषींनी गणपतीची आराधना केली. विघ्नासुराचे गणपतीबरोबर युद्ध झाले. गणपतीने त्याचा पराभव केला. त्यामुळे विघ्नहर राक्षस गणपतीला शरण गेला.

गणपतीने त्याला माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की, तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव तुमच्या भक्तांनी घ्यावे, तसेच तुम्ही याच ठ‍िकाणी रहावे. त्यावेळपासून गणपती या ठिकाणी राहू लागले. त्यानंतर सर्व राक्षसांनी मिळून एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधले. भाद्रपद गणेश चतुर्थीला चार दिवस या ठिकाणी मोठी यात्रा भरते. दर महिन्यातील चतुर्थीला देखील या ठिकाणी भाव‍िक दर्शनासाठी गर्दी करतात.

रूपाली केळस्कर

Recent Posts

अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नावर कडक कारवाई करा: प्रगती अहिर

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना ( Prajwal Revanna ) याने अनेक…

26 mins ago

लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा: नाना पटोले

काँग्रेसने ( Congress) देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची…

48 mins ago

कलर्स मराठीचा नवीन शो ‘अबीर गुलाल’चा लक्षवेधी प्रोमो रिलीज

संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स (Colors Marathi) मराठी आता नव्या रूपात हे वर्ष साजरे करायला…

1 hour ago

सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनची आत्महत्या

अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर 14 एप्रिल 2023ला गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबार…

2 hours ago

नरेंद्र मोदीच खरा भटकता आत्मा,१० वर्ष केवळ जगभर भटंकती; मोदी प्रधानमंत्री कमी आणि प्रचारमंत्रीच जास्त: नाना पटोले

काँग्रेसच्या जाहिरनाम्यात धर्माचा उल्लेख कुठेही केलेला नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सातत्याने काँग्रेसबद्दल अपप्रचार…

2 hours ago

आवळा खाण्याचे गुणकारी फायदे

सर्वोत्तम स्वास्थवर्धक, सर्व दोषणाशक आणि सर्वगुणसंपन्न म्हणून आयुर्वेदात ज्याचे नाव सर्वात पाहिले घेतले जाते   तो…

3 hours ago