शिवजयंती साजरी करण्यावरून रविवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) ‘एनएसयुआय’ आणि अखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी ‘एसएफआय’च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची तोडफोड केली आणि प्रतिमेला घालण्यात आलेला हार कचरापेटीत फेकून दिला. यावरून दोन्ही विद्यार्थी संघटना आमने-सामने आल्याने विद्यापीठात तणावाची परिथिती निर्माण झाली होती. (Vandalism of Shivaji maharaj’s image, garland thrown in dustbin)
‘एसएफआय’च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचाच नव्हे तर, महात्मा ज्योतिबा फुले आणि महाराणा प्रताप यांचादेखील अवमान केला आहे. शिवजयंतीचा कार्यक्रम संपताच ‘एसएफआय’चे विद्यार्थी या ठिकाणी आले आणि त्यांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. भारतीयांसाठी आदर्श असलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचा ते अपमान का करतात?,” अशी संतप्त प्रतिक्रिया अभाविपच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना अभाविपचे सचिव उमेशचंद्र अजमेरा म्हणाले, “शिवजयंतीनिमित्त आम्ही स्टुडंट अॅक्टिविटी सेंटर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवली होती. मात्र, ‘एसएफआय’च्या विद्यार्थ्यांनी ही प्रतिमा बाहेर काढली. तसेच हार कचरापेटीत फेकून दिला.”
मात्र, ‘एनएसयुआय’ने अभाविपचे आरोप फेटाळून लावले आहेत. ” ‘अभाविप’ने ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. पण ‘अभाविप’ने अशी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. तशी रीतसर परवानगी घेण्याआधीच याठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे ‘एनएसयुआय’च्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणाहून हटवली”, अशी प्रतिक्रिया एनएनयुआय सचिवांनी दिली. दरम्यान, ‘एसएफआय’च्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘अभाविप’ने केली आहे.
हे सुद्धा वाचा
धनुष्य-बाण, शिवसेनेसाठी २००० कोटींचा सौदा ; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
शिवभक्तांना शिवनेरीवर येण्यापासून मज्जाव का करता? संभाजी राजेंनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले
२०२३ च्या मध्यावर मोदींचा राजीनामा ; न्यायमूर्ती, राजकारणी, उदयगपतींवर ‘पेगासस’ची हेरगिरी
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…