मुंबई

मौलवी, पोपकडे त्यांच्या सिद्धांताचे पुरावे मागण्याची ‘अनिस’ची हिंमत आहे का? ; ‘अनिस’वर बंदी घालण्याची महिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची मागणी

हिंदू धर्मविरोधात गरळ ओकणाऱ्या अनिसवर महाराष्ट्रात बंदी आणण्याची मागणी प्रदीप नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. अनिसच्या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे. अनिस केवळ हिंदू धर्माला लक्ष्य करण्याचे काम करीत आहे. इतर धर्मांतील वाईट चालीरीतींवर ते टीका का करीत नाहीत. कुठल्यातरी नदीवर नेऊन त्या नदीतील पाणी शिंपडून तुम्ही पवित्र झाल्याच्या भूलथापा ख्रिश्चन धर्मातील पाद्री मारत असतात. अशा पाद्रींविरोधात अनिस आवाज का उठवीत नाहीत? असा सवाल प्रदीप नाईक यांनी विचारला आहे. (Does ‘Anis’ dare to ask the Pope Or Maulavi for proof of his theory?) मशिदीत महिलांना अद्यापही प्रवेश दिला जात नाही. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना देखील मशिदीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. त्याविरोधात अनिस का बोलत नाही? फक्त हिंदू धर्मालाच का ‘टार्गेट’ केले जात आहे?

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल केलेल्या विधानाबद्दल नाईक यांनी आक्षेप नोंदविला आहे. ते म्हणाले, ‘त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी आम्ही केली होती. मात्र, अद्यापही त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.”

 

बागेश्वर बुवांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे   

बागेश्वर महाराज यांनादेखील ‘अनिस’ने लक्ष्य केले असल्याचे या निवेदनात म्हंटले आहे. त्याबाबत नाईक यांना प्रश्न विचारण्यात आला. संत तुकाराम यांच्याबद्दल भोंदू बागेश्वर बुवाने केलेल्या वक्तव्याचा प्रदीप नाईक यांनी निषेध केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “मी देखील वारकरी संप्रदायातीलच आहे. तुकाराम महाराज आपल्या सर्वांसाठी वंदनीय आहेत. बागेश्वर महाराजांनी नेमक्या कोणत्या अर्थाने ही टिप्पणी केली हे जाणून घेतले पाहिजे.” प्रदीप नाईक यांना भोंदू बुवा बागेश्वरने नेमकी कोणती वक्तव्ये केली हे सांगितल्यानंतर त्यांनी बागेश्वर बुवांचा निषेध करीत त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे असे म्हंटले आहे.

भोंदू बागेश्वर काय म्हणतो ते पहा?


हे सुद्धा वाचा

श्याम मानव म्हणाले, धिरेंद्र महाराजांमुळे देशाचे नाव जगात होईल!

पळपुटया बागेश्वरच्या डोक्यावर परिणाम; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची निंदा नालस्ती

अंधश्रद्धा निर्मूलनकारांचा विज्ञानावरही अविश्वास; राम कदम यांची खोचक टीका

 

काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?

संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली म्हणून त्यांना माऊली म्हटलं गेलं. परंतु माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर माझ्या आईने १५ एकर कोरडवाहू शेतीत काम करून चार भिंतीचं घर चालवलं, ती माझ्यासाठी विश्ववंदनीय असायला हवी, असे वादग्रस्त वक्तव्य सुषमा अंधारेंनी यांनी केले होते. पण या वक्तव्याबद्दल त्यांनी वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागितली होती. कळतनकळतपणे चूक झाली असेल तर वारकरी संप्रदायाची माफी मागते, अशा शब्दांत त्यांनी क्षमा मागितली होती. भोंदू बागेश्वर बुवा प्रामाणिकपणे सर्व महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागणार का? असा सवाल वारकरी संप्रदायातून आता विचारण्यात येत आहे.

टीम लय भारी

Recent Posts

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

14 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

14 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

14 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

15 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

17 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

18 hours ago