राष्ट्रीय

Ghulam Nabi Azad : काँग्रेसचे निर्णय राहुल गांधी घेत नाहीत; गुलाम नबी आझाद यांचा खुलासा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाला अखेरचा रामराम केला आहे. काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर नाराज होऊन गुलाम नबी आझाद यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह इतर सर्व पदांचा देखील राजीनामा दिला. गुलाम नबी आझाद यांच्याकडून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचे पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रातून त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात थेट नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे. पक्षाचे निर्णय हे राहुल गांधी यांचे सेक्रेटरी आणि सुरक्षा रक्षक घेत आहेत. याशिवाय राहुल गांधी हे स्वतःच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करत असल्याचा आरोप गुलाम नबी आझाद यांच्याकडून करण्यात आला आहे.

‘अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावूक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचं माझं 50 वर्षांचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने ‘भारत जोडो’ यात्रा काढण्यापूर्वी ‘काँग्रेस जोडो यात्रा’ काढावी.’ असे गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे. तसेच राहुल गांधी हे पक्षातील कोणत्याही ज्येष्ठ नेत्याचा आदर करत नाही, उलट त्यांच्याकडून ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करण्यात येत असल्याचा धक्कादायक खुलासा गुलाम नबी आझाद यांनी केला आहे.

राहुल गांधी यांच्यावर गुलाम नबी आझाद यांनी या पत्राच्या मध्यमातून हल्ला चढवला आहे. ‘तुमच्या नेतृत्वाखाली पक्ष चांगली कामगिरी करत आहे. पण दुर्दैवाने राहुल गांधी यांचा पक्षप्रवेश झाल्यापासून, विशेषत: 2013 नंतर तुम्ही राहुल यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर, त्यांनी पक्षातील चर्चेची संपूर्ण ब्लू प्रिंटच उद्ध्वस्त करुन टाकली आहे. सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला करण्यात आलं. तर अननुभवी नेते पक्षाचा कारभार पाहू लागले.’ असे गुलाम नबी आझाद यांच्याकडून या पात्रात लिहिण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

Ghulam Nabi Azad Resigns : देशात काँग्रेसला मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसला रामराम

BMC Election 2022 : मनसेने महानगरपालिका निवडणुकीसाठी कसली कंबर

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा पुढचा ‘टार्गेट’ आदित्य ठाकरे?

काँग्रेस पक्षाचे महत्वपूर्ण निर्णय हे राहुल गांधी यांनी घेणे अपेक्षित आहे किंवा हे निर्णय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून अथवा वर्किंग कमिटीकडून घेण्यात येत असतात. परंतु हे निर्णयचक्क राहुल गांधी यांचे पीए आणि सुरक्षा रक्षक घेत आहेत, असा धक्कादायक खुलासा गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. दरम्यान, पक्षातील वरिष्ठ नेत्यांना पक्षासंबंधी घेण्यात येणाऱ्या निर्णय प्रक्रियेतून बाजूला केले जात आहे, ज्यामुळे वरिष्ठ नेत्यांचा अपमान होत असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी पत्रातून म्हंटले आहे.

पूनम खडताळे

Recent Posts

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

43 mins ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

1 hour ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

2 hours ago

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

2 hours ago

हॉटेलात गोळीबार करुन पळ काढणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहराच्‍या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्‍यावर संशयितांना…

3 hours ago

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…

5 hours ago