राष्ट्रीय

Farmers protest : किमान आधारभूत किमतीसाठी पुन्हा एकदा शेतकरी देणार सरकारला टक्कर

किमान आधारभूत किमतीसाठी पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक होण्याच्या तयारीत आहे. किमान आधारभूत किमतीच्या म्हणजे एमएसपी हमीसह अनेक मागण्या घेऊन शेतकरी दिल्लीत आंदोलन  करणार आहेत. शेतकऱ्यांनी निदर्शन करण्याचे आवाहन करण्यापूर्वीच पोलिसांनी दिल्ली हरियाणाला जोडणाऱ्या टिकरी सीमेवर सिमेंटचे बॅरिकेट उभारण्यास सुरुवात केली आहे. मागच्या वेळच्या हिंसाचाराच्या घटना विचारात घेऊन सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. निदर्शनासाठी शेतकरी दिल्लीमध्ये पोहोचले आहेत.

दिल्लीकडे येत असतांना शेतकरी नेते राकेश टिकैत यांना दिल्ली पोलिसांनी रविवारी (21ऑगस्टला) गाझीपूर सीमेवर रोखले. राकेश टिकैत यांना दिल्लीला जायचे होते. मात्र पोलिसांनी नकार दिला. त्यानंतर टिकैत समर्थकांनी रस्त्यावर बसून विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी सगळयांना मधु विहार पोलिस एसीपी कार्यालयात नेले. 2020 आणि 2021 मध्ये दिल्लीमध्ये मोदी सरकारच्या विरोधात शेतकरी आंदोलन ( Farmers Movement) पेटले होते. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर अखेर दिल्लीच्या सीमांवरील शेतकरी आंदोलन संपुष्टात आले होते. कोरोना काळात सुरूवातील शेतकरी आंदोलक ठाण मांडून बसले होते. या आंदोलनामध्ये संयुक्त किसान मोर्चातील 40 हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झाल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

Nilesh Rane : हरिहरेश्वर येथे सापडलेल्या बोटीवरुन निलेश राणेंनी उपटले सरकारचे कान

Irrigation scam : काय आहे सिंचन घोटाळा ?

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे 1,135 कोटींचे नुकसान

सरकारने आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. युपी आणि हर‍ियाणा सरकारने आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याचे मान्य केले होते. शेवटी किसान मोर्चाने स‍िंघू सीमेवर बैठक घेऊन हे आंदोलन संपवले होते.

आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात एकाचा मृत्यू झाला होता. शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला होता. ट्रॅक्टर परेडदरम्यान शेतकरी आंदोलकांचा संघर्ष पेटला होता. शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅर‍िकेटस तोडले होते. 26 जानेवारीला लाल‍ किल्ला परिसरात शेतकरी आणि पोलीस यांच्यात मोठा संघर्ष झाला होता.

रूपाली केळस्कर

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

3 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

4 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

4 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

5 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

5 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

7 hours ago