राष्ट्रीय

United Nations Security Council : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वासाठी भारताला फ्रान्सचा पाठिंबा

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी स्थान मिळण्यासाठी पाठिंबा वाढत आहे. भारताला स्थायी सदस्यत्त्वासाठी आता युके नंतर फ्रान्सने देखील पाठिंबा जाहीर केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुरक्षा परिषदेत संबोधित करताना फ्रेंच उपप्रतिनिधी नॅथली ब्रॉडहर्स्ट एस्टिव्हल म्हणाल्या, फ्रान्स कायमस्वरूपी जागेसाठी कायम सदस्य म्हणून जर्मनी, ब्राझील, भारत आणि जपानच्या उमेदवारांना समर्थन जाहीर केले आहे.

यूकेने देखील संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षापरिषदेत भारताला स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दिला होता. संयुक्त राष्ट्रातील ब्रिटनच्या राजदूत बार्बरा वुडवर्ड यांनी म्हटले होते की, आम्ही भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझीलसाठी नवीन कायमस्वरूपी जागा निर्माण करण्यास तसंच परिषदेवर कायम आफ्रिकन प्रतिनिधीत्वास समर्थन देतो.
युकेच्या पाठोपाठ आता फ्रान्सने देखील संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला पाठिंबा जाहीर केला आहे. सुक्रवारी फ्रान्सच्या उपप्रतिनिधी नॅथली ब्रॉडहर्स्ट एस्टिव्हल सुरक्षा परिषदेत म्हणाल्या, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षापरिषदेत कायमस्वरूपी सदस्य म्हणून जर्मनी, ब्राझील, भारत आणि जपानच्या उमेदवारांना फ्रान्स समर्थन देईल. आम्हाला परिषदेच्या स्थायी सदस्यांसह आफ्रिकन देशांचे अधिक प्रतिनिधित्व हवे आहेत.

सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सभासद राष्ट्रे असतात. मेरिका,फ्रान्स,इंग्लैंड, रशिया व चिन ही पाच राष्ट्रे सुरक्षा परिषदेची स्थायी सभासद आहेत. तर कोलंबिया, भारत, जर्मनी, पौर्तुगाल, दक्षिण आफ्रिका, अझरबैजान, ग्वातेमाला, मोरोक्को, पाकिस्तान, टोगो ही राष्ट्रे अस्थायी सदस्य आहेत. संयुक्त राष्ट सुरक्षा परिषद जागतिक शांतता, वादग्रस्त आंतरराष्ट्रीय मुद्यांची सोडवणूक, तसेच एखादा देश अति आक्रमक भूमिका घेत असल्यास अशा देशाविरोधात आर्थिक निर्बंध किंवा लष्करी कारवाई करण्याचे काम करतो. सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्व मिळविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून भारत प्रय्तनशील आहे, पण भारताला अद्याप कायम सदस्यत्व मिळालेले नाही.

हे सुद्धा वाचा :
Ambadas Danve: संदीपान भुमरेंचे मनी लाँड्रींग, दारूची नऊ दुकाने !; अंबादास दानवेंचा आरोप

VIDEO : शरद साखर कारखान्यात होतोय आर्थिक गैरव्यवहार : अंबादास दानवे

Mumbai Mahanagarpalika : मुंबईसाठी नुसत्याच विकासाच्या गप्पा; शौचालयांअभावी महिलांची कुचंबना

भारत प्रथम १९५०-५१ मध्ये ‘यूएनएससी’चा तात्पुरता सदस्य झाला. त्यानंतर १९६७-६८, त्यानंतर १९७२-७३, १९७७-७८, १९८४-८५, १९९१-९२ आणि २०११-१२ मध्ये भारत तात्पुरता सदस्य म्हणून निवडला गेला. त्यानंतर 1 जानेवारीपासून भारत पून्हा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत तात्पूरता सदस्य झाला आहे. भारत गेल्या अनेक वर्षांपासून कायम सदस्यत्वासाठी प्रयत्नशील असून भारताचे शेजारी राष्ट्र चीनने याबाबत कायमच भारताला विरोध केलेला आहे. संयुक्त राष्ट्रातील चीनने आपले स्थान बळकट केले आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

नारळपाणी पिण्याचे फायदे

नारळपाणी म्हणजे उन्हाळ्यातील एक प्रकारचं अमृतचं पण नारळपाणी आपण फक्त उन्हळ्यातच नाहीतर बाकीच्या ऋतूंमध्ये देखील…

31 mins ago

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

17 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

17 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

17 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

17 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

20 hours ago