राष्ट्रीय

म्हणून २ ऑक्टोबर पासून भारतात स्वच्छ भारत मिशन सुरु झाला…

२ ऑक्टोबर हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका मांडणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांच्या आठवणीसाठी राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या सांस्कृतीक आणि देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. महात्मा गांधी यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारत भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. २ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. तर २०१४ साली गांधी जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनला सुरुवात केली. त्याचा दुसरा टप्पा गांधी जयंती २०२१ रोजी सुरू झाला.

मोहनदास करमचंद गांधी हे एक भारतीय वकील, राजकीय नीतितज्ञ होते. गुजरातमधील एका हिंदू कुटुंबात जन्मलेल्या आणि वाढलेल्या गांधींनी लंडन येथील इनर टेंपल येथे कायद्याचे प्रशिक्षण घेतले. महात्मा गांधी २१ वर्ष दक्षिण आफ्रिकेत राहिला. येथेच गांधींनी पहिल्यांदा नागरी हक्कांच्या मोहिमेत अहिंसक प्रतिकार केला. १९१५ साली ते भारतात परतले. भारतात परतताच त्यांनी शेतकरी आणि शहरी मजुरांना अत्याधिक जमीन-कर आणि भेदभावाच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी संघटित करण्याचे ठरवले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ते नेटाने शेवटपर्यंत लढले.

त्यांना सर्वांनी आदरपूर्वक महात्मा असे संबोधायला सुरुवात केली.ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी अहिंसक प्रतिकार केला. त्यांनी जगभरातील नागरी हक्क आणि स्वातंत्र्यासाठी चळवळींना प्रेरणा दिली. गांधी जयंती साजरी करण्यासाठी राष्ट्रीय सुट्टी दिली जाते.

हे ही वाचा 

२ हजारांच्या नोटांबाबत RBI चा मोठा निर्णय, नोटा बदलण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

‘कुठेतरी आपलं चुकतंय…’ विसर्जन मिरवणुकीबद्दल राज ठाकरेंचे परखड मत!

विदेश दौऱ्यांवरून आदित्य ठाकरेंनी केली सरकारची धुलाई!

गांधींचे आवडते भजन (हिंदू भक्ती गीत), रघुपती राघव राजा राम, सहसा त्यांच्या स्मरणार्थ विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून गायले जाते. महाविद्यालये, स्थानिक सरकारी संस्था आणि सामाजिक-राजकीय संस्थांद्वारे प्रार्थना सभा, विविध शहरांमध्ये स्मरणार्थ समारंभ कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भाषण, चित्रकला, निबंध आणि महात्मा गांधी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतल्या जातात. या दिवशी समाजिक प्रकल्पांसाठी पुरस्कार दिले जातात. देशभरातील महात्मा गांधींचे पुतळे फुलांनी आणि हारांनी सजवले जातात आणि काही लोक त्या दिवशी दारू पिणे किंवा मांस खाणे टाळतात. सार्वजनिक इमारती, बँका आणि पोस्ट ऑफिस बंद ठेवले जाते. १५ जून २००७ रोजी यूएन जनरल असेंब्लीने २ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली.

हा महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त भारतात मोठ्या संख्येने कार्यक्रम आयोजित केले जातात. 2 ऑक्टोबर भारताच्या तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. महात्मा गांधी स्वातंत्र्य सैनिक होते. महात्मा गांधी यांना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल दिली.

टीम लय भारी

Recent Posts

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

7 mins ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

14 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

16 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

16 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

17 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

18 hours ago