२ ऑक्टोबर हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका मांडणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांच्या आठवणीसाठी राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या सांस्कृतीक आणि देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. महात्मा गांधी यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारत भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. २ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. तर २०१४ साली गांधी जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनला सुरुवात केली. त्याचा दुसरा टप्पा गांधी जयंती २०२१ रोजी सुरू झाला.
मोहनदास करमचंद गांधी हे एक भारतीय वकील, राजकीय नीतितज्ञ होते. गुजरातमधील एका हिंदू कुटुंबात जन्मलेल्या आणि वाढलेल्या गांधींनी लंडन येथील इनर टेंपल येथे कायद्याचे प्रशिक्षण घेतले. महात्मा गांधी २१ वर्ष दक्षिण आफ्रिकेत राहिला. येथेच गांधींनी पहिल्यांदा नागरी हक्कांच्या मोहिमेत अहिंसक प्रतिकार केला. १९१५ साली ते भारतात परतले. भारतात परतताच त्यांनी शेतकरी आणि शहरी मजुरांना अत्याधिक जमीन-कर आणि भेदभावाच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी संघटित करण्याचे ठरवले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ते नेटाने शेवटपर्यंत लढले.
I bow to Mahatma Gandhi on the special occasion of Gandhi Jayanti. His timeless teachings continue to illuminate our path. Mahatma Gandhi’s impact is global, motivating the entire humankind to further the spirit of unity and compassion. May we always work towards fulfilling his…
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2023
त्यांना सर्वांनी आदरपूर्वक महात्मा असे संबोधायला सुरुवात केली.ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी अहिंसक प्रतिकार केला. त्यांनी जगभरातील नागरी हक्क आणि स्वातंत्र्यासाठी चळवळींना प्रेरणा दिली. गांधी जयंती साजरी करण्यासाठी राष्ट्रीय सुट्टी दिली जाते.
हे ही वाचा
२ हजारांच्या नोटांबाबत RBI चा मोठा निर्णय, नोटा बदलण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
‘कुठेतरी आपलं चुकतंय…’ विसर्जन मिरवणुकीबद्दल राज ठाकरेंचे परखड मत!
विदेश दौऱ्यांवरून आदित्य ठाकरेंनी केली सरकारची धुलाई!
गांधींचे आवडते भजन (हिंदू भक्ती गीत), रघुपती राघव राजा राम, सहसा त्यांच्या स्मरणार्थ विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून गायले जाते. महाविद्यालये, स्थानिक सरकारी संस्था आणि सामाजिक-राजकीय संस्थांद्वारे प्रार्थना सभा, विविध शहरांमध्ये स्मरणार्थ समारंभ कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भाषण, चित्रकला, निबंध आणि महात्मा गांधी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतल्या जातात. या दिवशी समाजिक प्रकल्पांसाठी पुरस्कार दिले जातात. देशभरातील महात्मा गांधींचे पुतळे फुलांनी आणि हारांनी सजवले जातात आणि काही लोक त्या दिवशी दारू पिणे किंवा मांस खाणे टाळतात. सार्वजनिक इमारती, बँका आणि पोस्ट ऑफिस बंद ठेवले जाते. १५ जून २००७ रोजी यूएन जनरल असेंब्लीने २ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली.
हा महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त भारतात मोठ्या संख्येने कार्यक्रम आयोजित केले जातात. 2 ऑक्टोबर भारताच्या तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. महात्मा गांधी स्वातंत्र्य सैनिक होते. महात्मा गांधी यांना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल दिली.